"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Thursday, March 3, 2011

न जुळणारे समीकरण



संपूर्ण जगालाच भयानक दहशतवादाने वेढले आहे. आणि त्याला विविध कारणं आहेत. कुठे वांशिक संघर्ष, कुठे ऐतिहासिक लढाई, प्रस्थापित राजेशाहीविरुद्ध, सांप्रदायिक कट्टरतेतून, धार्मिक असहिष्णुतेतून अशी दहशतवादी कृत्ये चालू आहेत. भारताला ज्या प्रकारच्या दहशतवादाने विळखा घातलाय त्यासंबंधी अधिक सांगायला नको! संपूर्ण जग पादाक्रांत करायला निघालेली ती एक रानटी टोळधाड आहे. एका विशिष्ट रंगातच सगळ्यांना जबरदस्तीने रंगवण्याचा तो घृणास्पद प्रयत्न आहे. “तुम्ही सर्वजण एकतर पापी आहात..आणि पापमुक्तीसाठी आकाशातील बापालाच तुम्ही प्रार्थिले पाहिजे” दुसरा मार्ग नाही. अन्यथा नरकात खितपत पडाल. किंवा “बोला आहे का ह्याच्यावर विश्वास की भोसकू”? अशी असहिष्णू वृत्ती झपाट्याने, सरकारी मदतीने पसरली आहे. ह्याला तोंड देण्यासाठी भारतातील सज्जनशक्ती संघटित आणि जागृत होणे गरजेचे आहे. ही सज्जनशक्ती जोपर्यंत संघटितरित्या उभी राहत नाही तोपर्यंत कुणीही यावे आणि मारून जावे असेच चालू राहणार.

दहशतवादी कृत्य कुणीही केले तरी ते समाजव्यवस्थेला घातकच असते. कोणत्याही कोनातून ते पूरक, पोषक होऊ शकत नाही. परंतु दहशतवादाला धर्माशी जोडण्याचे काम काही नतद्रष्ट करत आहेत. सत्ता, मतपेटी आणि एकगठ्ठा मतं यावर डोळा ठेवून हे केलं जातंय हे सांगायला आणि समजायला विद्वानांची गरज नाही. परंतु आपल्या देशातील स्वयंघोषित विद्वान आपल्या अकलेचे तारे तोडतात आणि समाजातील सौहार्दच धोक्यात येते.

दिग्विजय सिंग हे असेच एक मेषपात्र! मालेगावचे एक प्रकरण असे सापडले ज्यात ‘संशयित’ काही हिंदू आहेत. परंतु घाईघाई करून ‘संशयित’ हेच ‘आरोप सिद्ध झालेले गुन्हेगार’ आहेत अशा तऱ्हेची मांडणी करण्यात आली. ठराविक समाजाला लक्ष्य बनवण्यात आलं. ‘हिंदू दहशतवाद’ अशी नवीनच संकल्पना काढली गेली. पण हिंदू समाजाने त्यावर जबरदस्त प्रतिक्रिया दिली. मग म्हटले गेले ‘भगवा दहशतवाद’, त्यावरही टीका झाल्यावर ‘बहुसंख्यांचा दहशतवाद’ ही आणखी एक संकल्पना आणली. कोण बहुसंख्य? संपूर्ण जनताच दहशतवादी? हे सगळं कोणाला खूष करायला? कोणाची दाढी कुरवाळण्यासाठी? पण प्रसारमाध्यमातील मिंध्या बाहुल्यांनी लगेच इशाऱ्यावर नाचायला सुरुवात केली. लोकसत्तात तर “भगवे दहशतवादी” अशा ठळक नावाने अग्रलेख लिहिला गेला. ह्या ‘अग्र’लेखामागे कोणाची ‘पार्श्व’भूमिका होती हे वेगळे सांगायला नको. विकता का नीतीमत्ता तुम्ही? वैय्यक्तिक स्वार्थापोटी तुम्ही समाजालाही शिव्या घालायला आणि दूषणे द्यायला कमी करत नाही. तुम्हाला राज्यसभेवर पाठवण्यासाठी हे असे प्रकार? काय दिवे लावणार तुम्ही जाऊन तिथे? एक बरे झाले आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस ग्रुप’ ने ही विषवल्ली वेळीच ओळखून बाजूला करण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. बहुधा १०० घडे भरण्यासाठी थांबले असावेत. आता हकालपट्टी निश्चित झाली आहे असे समजते. लोकसत्ताच्या घसरणीला जबाबदार असणाऱ्यांना आता लवकरच जावे लागणार ही आनंदाची बातमी आहे.

आता वरचे गणित आणि प्रश्न न सुटणारे आहेतच, पण काही बिंदूंचा विचार खाली केला आहे ज्यावरून काँग्रेसचे स्वत्वहीन नेते, प्रसारमाध्यमांचे दलाल, मानवाधिकारांचे दुकानदार असे सर्वजण एक ‘न जुळणारे समीकरण’ जुळवण्याच्या घोर प्रयत्नात असल्याचे दिसते. आपणही त्याचा नीट विचार करू. मालेगाव मधे प्रज्ञासिंग ठाकूर आरोपी आहे. ती व अन्य आरोपी म्हणजेच कर्नल पुरोहित, दयानंद पांडे, स्वामी असीमानंद यांना गजाआड केले आहे. आणि हे सर्व हिंदू असल्याने हिंदू दहशतवाद असे म्हटले आहे. केस अजून चालू आहे. पण ह्यांना दहशतवादी आणि तेही ‘हिंदू दहशतवादी’ म्हटले गेले. आणि ह्याचा संबंध ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ ह्या हिंदूंच्या संघटनेशी जोडला गेला. मग तो एक ऐकलेला विनोद खराच वाटू लागतो – एकदा अमेरिकन, रशियन आणि भारतीय पोलिसांचा संयुक्त सराव सुरु असतो... दरवेळी एक लांडगा सोडला जातो आणि तो शोधून आणण्याचे काम दिलेले असते. पहिल्यांदा अमेरिकन पोलीस. ते आपल्याजवळील उपकरणे वापरून १० मिनिटांत शोधून काढतात ठावठिकाणा आणि मग ५ मिनटात हजर करतात. रशियन पोलीस २० मिनिटे घेतात लांडगा हजर करायला. आता पाळी येते भारतीय पोलिसांची. लांडगा रानात सोडला जातो. वेळ सुरु होते. पोलीस केवळ काठी घेऊन निघतात. जबरदस्त आत्मविश्वास. सर्वजण आश्चर्य व्यक्त करतात. पण तासभर उलटून जातो, लांडगा तर नाहीच, पण भारतीय पोलिसांचाही काही पत्ता नसतो. शेवटी अमेरिकन आणि रशियन पोलीस मागावर निघतात. रानाच्या मध्यभागी पोहोचतात तर काय, एक विलक्षण दृश्य दिसतं. भारतीय पोलीस एका कुत्र्याला झाडाला उलटे टांगून मारत असतात काठीने..तो लालेलाल होऊन केकाटत असतो आणि पोलीस त्याला सांगत असतात, “म्हण, मीच तो लांडगा!”  

मुस्लिमविरोधी, पाकविरोधी तरी ISI कडून मदत? - हिंदुत्ववादी म्हणजेच पाकिस्तान आणि मुस्लिमविरोधी अशी धारणा आहे. आणि हा प्रचारही काँग्रेसने निष्ठेने केलाय! खरंतर संघाला हिंदूंचे संघटन अभिप्रेत आहे. कोणाचाही विरोध नाही. संघाचे द्वितीय सरसंघचालक श्रीगुरुजी यांनी स्पष्ट केले की ‘संघाचे काम हे ‘सर्वेषां अविरोधेन’ चालणारे आहे’. आणि शिवाय एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, “या देशात एकही मुसलमान आणि ख्रिश्चन नसता आणि आजच्यासारखेच हिंदू असंघटीत आढळले असते तरीही हिंदू संघटन केलेच असते”. म्हणजेच हे काम परिस्थितीसापेक्ष आहे. पण काँग्रेसच्या म्हणण्याप्रमाणे हे पाकिस्तान आणि मुस्लिमविरोधी आहे. ठीक. तूर्तास हा (अप)प्रचार मान्य केला तर मग संघाच्या मा. इंद्रेश कुमार जी या प्रचारकावर आरोप केला की त्यांना ISI कडून मदत मिळते, त्याचे काय? ..... ‘न जुळणारे समीकरण’!

हिंदुत्ववादी. तरी सरसंघचालकांच्या हत्येचा कट? - मधेच हेही एक पिल्लू सोडण्यात आले की रा. स्व. संघाच्या परमपूजनीय सरसंघचालकांच्या हत्येचा कट हा मालेगाव प्रकरणातील ‘हिंदूंनी’ रचला आहे.  http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5776271.cms . अरे मग निदान त्यांना हिंदुत्ववादी तरी म्हणून नका! ह्या गौप्यस्फोट करणाऱ्यांना पायाखाली काय जळतंय ते दिसत नाही. नसत्या उठाठेवी बऱ्या जमतात. त्याही असंबद्ध! हिंदुत्ववादी दहशतवादी, संघाचा सहभाग आणि संघाच्याच सरसंघचालकांच्या हत्येचा कट? काय आहे हे? .... ‘न जुळणारे समीकरण’!

जर्मन बेकरी बॉम्बस्फोट नक्की कोणी केला? - पुण्यात कोरेगाव पार्कमध्ये बॉम्बस्फोट झाल्यावर यात हिंदुत्ववाद्यांचा हात असू शकतो अशी मुक्ताफळं उधळली राज्य सरकारने म्हणजे बाहुल्यांनी! आणि धड काही न सांगता आले, या राज्याचे गृहराज्यमंत्री बागवे यांना (हेच ते ज्यांनी स्वामीनिष्ठा दाखविण्यासाठी राहुल गांधींचे जोडे उचलून कवटाळले होते! त्यांच्याकडून अधिक काय अपेक्षा असणार म्हणा!). या २ बातम्या पहा- १) http://www.starmajha.com/TopStoryLanding.aspx?NewsID=9937 २) http://www.esakal.com/esakal/20100409/5654627742262238642.htm. या परस्परविरोधी बातम्या आहेत. एक तर तपास पूर्ण झाल्याशिवाय बडबड का करावी? असा संभ्रम पसरवून काय नक्की साध्य केले? .... ‘न जुळणारे समीकरण’!

संघप्रचारक सुनिल जोशींची हत्या कोणी केली? – एका ठिकाणी सुनील जोशी या मृत संघप्रचारकाचा अजमेर, मालेगाव येथील स्फोटात हात असल्याचे सांगितले जातेय, आणि त्याचवेळी दुसरीकडे त्याची हत्याही हिंदुत्ववाद्यांनीच केल्याचे सांगितले जाते. स्वामी असीमानंद म्हणे म्हणाले की सुनील जोशी असं बोलले आणि त्यांनी असं सुचवलं इ. आता सुनील जोशी मृत आहेत, हयात नाहीत. त्यांना विचारता येणार नाही. त्यांची चौकशी करता येणार नाही. करायचीच असेल तर त्यासाठी ‘वर’ जावे लागेल. म्हणजेच खरे मारेकरी शोधता येत नाहीत म्हणून ही अशी ढकलाढकली? यातून काय साध्य करायचेय? .... ‘न जुळणारे समीकरण’!

इंद्रेश कुमारांना अडकवण्याचे खरे कारण – मा. इंद्रेश कुमार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक. जम्मू आणि काश्मीर या राज्यात बरीच वर्षे प्रचारक म्हणून काम केल्याने तिथल्या परिस्थितीची उत्तम आणि सखोल जाण. तिथे फुटीरतावाद्यांना मोकळे रान सरकारने दिले आहे. इतके की तिथे श्रीनगरमधे तिरंगा फडकावू शकत नाही आपण. भारताच्या काश्मीरचा भाग चीनमध्ये दाखवणाऱ्या मेहबूबा सईद आणि ‘भूखे-नंगे हिंदुस्थान से अलग हो जाओ’ म्हणणाऱ्या अरुंधती रॉय ला सरकार काही करू शकत नाही.




पण या प्रतिकूल परिस्थितीतही तिथे शाखा चालवणाऱ्या प्रचारकांचे आदर्श इंद्रेश कुमार. भारतीयत्वाची भावना परिपुष्ट करणाऱ्या स्वयंसेवकांचे श्रद्धास्थान इंद्रेश कुमार. सध्या गेली काही वर्षे त्यांच्याकडे काम आहे ते ‘राष्ट्रीय मुस्लीम मंच’ या संस्थेचे. मुस्लीम समाजाला मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणारे इंद्रेश कुमार. ह्या कामातली सफलता पाहून काँग्रेसचे पित्त न खवळते तरच नवल. म्हणून अडकवले नाव. संशयाचे धुके निर्माण केले.
ह्यातून पुन्हा एकदा समोर आले .... ‘न जुळणारे समीकरण’!

हिंदू आणि दहशतवाद – ‘हिंदू’ आणि ‘दहशतवाद’ हे २ परस्परविरोधी शब्द आहेत. हिंदू हे पूजापद्धतीचे अथवा विशिष्ट संप्रदायाचे नाव नव्हे. धर्म आणि रिलीजन हे २ वेगवेगळे शब्द आहेत हे घटनेनेही स्पष्ट केले आहे (Art. 25) आणि सर्वोच्च न्यायालयाचे खंडीभर निर्णय हे स्पष्ट शब्दात निसंदिग्धपणे मांडतात. उदा. A.S. Narayana Deekshitulu v. State of A.P., (1996) 9 SCC 548, at page 590  : The word ‘dharma’ or ‘Hindu dharma’ denotes upholding, supporting, nourishing that which upholds, nourishes or supports the stability of the society, maintaining social order and general well-being and progress of mankind; whatever conduces to the fulfilment of these objects is dharma, it is Hindu dharma and ultimately “Sarva Dharma Sambhava”. उत्तम जीवनपद्धती म्हणजेच हिंदुत्व. दहशतवादाशी याचा सबंध कसा असेल? ज्याक्षणी एखादा ‘हिंदू’ दहशतवादी बनतो त्याक्षणी तो ‘हिंदू’ राहात नाही. आणि ज्याक्षणी दहशतवादी त्याचा चुकीचा मार्ग सोडून मानवतेच्या दिशेचा शोध घेतो, तो हिंदू बनण्याच्या दिशेने अग्रेसर होतो. मानवतेचे मूल्य म्हणजेच हिंदुत्व. ‘जगा आणि जगू द्या’ याहीपलीकडे जाऊन ‘जगा आणि दुसऱ्याला जगवा’ हे हिंदू जीवनपद्धती सांगते. इथल्या या शांतताप्रिय, सहिष्णू, शतकानुशतके अत्याचार सहन करत आलेल्या हिंदू समाजाला लक्ष्य करून, दहशतवादी संबोधून ही नेतेमंडळी काय करत आहेत? .... ‘न जुळणारे समीकरण’!

पडोसन किशोरकुमार, सुनिल दत्त, मेहमूद यांच्या पडोसन चित्रपटासारखे सध्या देशात झाले आहे. खिडकीतून तोंड हलवणारा वेगळाच आणि त्याला स्वर देणारा, आवाज देणारा वेगळाच! शिवाय सध्याचे केंद्रीय आणि राज्यस्तरीय नेतृत्व पाहता एक चतुर नार कर के सिंगार मेरे मन(मोहन) के द्वार ये घुसत जात, हम मरत जात, अरे हे हे हे | यक चतुर नार कर के सिंगार...अशीच अवस्था दिसते आहे. दिग्विजय सिंग आणि प्रभृतींना संदेश सुद्धा आहे गाण्यात
जा रे,जा रे कारे कागा
का का का क्यों शोर मचाये,
उस नारी का दास ना बन जो
राह चलत को राह बुलाए’ ||


त्या चित्रपटात मेहमूद ला किशोरकुमार आणि सुनिल दत्त चिडवतात, एकदा म्हणतात ‘अय्यो घोडे तेरी आणि एकदा एक चतुर नार’ तेव्हा शेवटी कंटाळून मेहमूद सांगतो क्या रे ये घोड़ा\-चतुर, घोड़ा\-चतुर बोला, येक पे रहना या घोड़ा बोलो या चतुर बोलो...तसंच हिंदू समाजाला दहशतवादी म्हणायचं आणि मग शब्द बदलायचा..परत म्हणायचं आणि बदलायचं असं चालू आहे. एकदा काय ते सांगा आम्ही इथला समाज दहशतवादी आहोत की हिंदू आहोत...दोन्ही तर असू शकत नाही!

Sunday, February 13, 2011

'जळण'





'जळण' ही माझी एक जुनी आणि आवडती कविता. वनवासी बंधू, उपेक्षित गिरिजन, भटके-विमुक्त अशांबद्दल चाललेले संघाचे प्रकल्प याबाबतीत अधिक ऐकायला मिळाले होते. आणि १२ वी म्हणजे काव्य स्फुरले नसते तरच नवल! एका वर्षी कॉलेजच्या स्वरचित काव्य स्पर्धेत प्रथम बक्षीस मिळवून दिले या कवितेने. आणि दुसऱ्या वर्षी एका राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत बहुधा दुसरे बक्षीस मिळाले. पण ती डोंबिवलीची संस्था अशा भागात शिक्षण प्रसाराचे काम करत असल्याने पुरस्कार रक्कम त्या कार्यक्रमातच संस्थेला परत केली. असा अवर्णनीय आनंद आणि समाधान या कवितेने मला दिले.
मी तुझा आभारी आहे.


Thursday, January 6, 2011

हिंदुधर्मो विजयताम् |


पुणे के समीप पिरंगुट स्थानपर स्थित है ‘झाँसी की रानी लक्ष्मीबाई लड़कियों की सैनिकी स्कूल’ | वहाँ इस ठंडी के सुहाने मौसम में उमड़ पडी थी भीड़ हिंदुत्व के पावन सिंधु में विहरनेवालों की | निमित्त था ‘विश्व संघ शिविर’ |

भारत में हिंदुत्व को लेकर चलनेवाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक अनुशासनबद्ध, बलशाली एवं सुसंस्कृत लोगों का संगठन है | हिंदू समाज को एक सूत्र में पिरोनेवाला विचार है हिंदुत्व | और संघ ने अपनाई है अनूठी कार्यपद्धती - शाखा ! घंटेभर की शाखा से निर्माण हुए स्वयंसेवक अन्यान्य भागों में जाकर शाखाएँ प्रारंभ करने लगे | ‘एक दीप से जला दूसरा’ | देशभर में फ़ैली हिंदुत्व की लहर |

भारत के बाहर रहनेवाला हिंदू भी पूरी तरह से असंगठित था | वहाँ के हिंदुओं को संगठित करने का कार्य प्रारंभ हुआ सन १९४७ में | दो स्वयंसेवक जहाज से  केनिया जा रहे थे | डेक पर परिचय हुआ और दोनों को ‘स्वयंसेवक’ होने का पता चल गया | वहीं फिर सूर्यसाक्षी से हुई संघ की प्रार्थना | यही भारत के बाहर की ‘पहली शाखा’! बाद में केनिया, मोरिशस, सुरिनाम, जर्मनी, अमरीका, इंग्लैंड, रशिया ऐसे देशों में नियमित रूप से शाखाएँ चलने लगी |
और धीरे-धीरे समय के साथ यह कार्य भी बढ़ा | परमपूजनीय डॉक्टर जी ने जो स्वप्न संजोया था, उस दिशा में कई कदम साथ में आगे बढ़ने लगे | भारत में भी और भारत के बाहर भी | भारत के बाहर हिंदू संगठित रूप से कार्यक्रम करने लगे, विश्वबंधुत्व के आवाज को, आवाहन को बुलंद करने लगे |

कार्यकर्त्ता प्रशिक्षण हेतू चलते हैं संघ शिक्षा वर्ग | इन वर्गों में विभिन्न भागों से स्वयंसेवक एकत्रित होते हैं, रहते हैं और अपनत्व के भाव की अनुभूती करते हैं | (http://vikramwalawalkar.blogspot.com/2010/07/blog-post_11.html) | इसी कार्यपद्धती के अनुरूप भारत के बाहर जहां संघ का काम चलता है वहाँ भी वर्ग होते है | परन्तु यह कार्यकर्त्ता एकत्रित आते हैं ‘विश्व संघ शिविर’ हेतू | पाँच वर्षों में एक बार भारत में होता है यह शिविर | २००० साल में केशवसृष्टी, मुंबई में तथा २००५ में गांधीनगर में संपन्न हुआ और इसी शृंखला में पुणे में हुआ २०१० का शिविर |

३५ देशोंसे ५१७ स्वयंसेवक-सेविकाएँ उपस्थित थी | इन में थायलैंड, श्रीलंका, मलेशिया, मोरिशस, अमरीका, जर्मनी, सुरीनाम, गयाना, केनिया, ऑस्ट्रेलिया, इंग्लैंड, फ्रान्स और ऐसे अन्य देशों से कार्यकर्त्ता उपस्थित थे | ५ दिन के शिविर का जाहीर समारोह बालेवाडी स्टेडियम पर संपन्न हुआ |
मंचपर उपस्थित थे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के परमपूजनीय सरसंघचालक जी मोहनजी भागवत, प्रमुख अतिथी विख्यात उद्योजक श्री. अभय फिरोदिया, राष्ट्र सेविका समिती की प्रमुख संचालिका माननीया प्रमिलाताई मेढे, और अन्य महानुभाव | स्टेडियम पर उमड़ पडी थी भीड़ राष्ट्रभक्त नागरिकों की | प्रस्तुत हुए कार्यक्रमों में पुणे महानगर और पश्चिम महाराष्ट्र प्रान्त के घोषवादकों का तथा रा. स्व. सेविका समिती के सेविकाओं द्वारा घोष के आकर्षक प्रात्यक्षिक हुए | संघशाखाओं के बाल स्वयंसेवकों ने शिवराज्याभिषेक का समारोह आखों के सामने खड़ा किया, रोमांचित कर उठे तुतारी के उच्चनिनादित स्वर |


पिम्परी से आये हुए बाल धुन में बजा रहे थे योगचाप (लेझीम) | घाटी लेझीम का अलग-अलग तालों पर एकसाथ बजना और लयबद्धता का प्रदर्शन यही साबित कर रहा था की उसी पुणे महानगरी में इन बालों को तैयार करनेवाले सैंकडो ‘दादोजी कोंडदेव’ हैं और उन में से कई उस स्टेडियम की भीड़ में उपस्थित थे | एक पुतला हटने से कुछ भी नहीं होता | क्योंकी राष्ट्रनिर्माण का कार्य पुतलों के नहीं पुरुषार्थ के आधार पर होता है |

विश्व संघ शिविर के शिक्षार्थीयों ने दंड के और व्यायामयोग के प्रात्यक्षिक प्रस्तुत किए |


प्रमुख अतिथी द्वारा दिया हुआ भाषण महत्वपूर्ण और सुसंबद्ध था | उन्हों ने संघ के स्वयंसेवकों की सराहना करते हुए ऐसे कार्य की आवश्यकता अधोरेखित की | जी.एन.पी बढ़ रहा है वह सरकार के कारण नहीं, अपितु आम जनता के कारण | और संभवतः सरकार उसपर ध्यान नहीं दे रहा है इसीलिये प्रगती हो रही है | आज चारों ओर जो घोटाले ही घोटाले दिखाई दे रहे है उनपर टिप्पणी करते हुए उन्होंने शासन कों आड़े हाथ लिया और मुझ जैसे कई उद्योजक साफ-सुथरा एवं भ्रष्टाचारमुक्त वातावरण चाहते हैं ऐसा कहा | केवल आर्थिक प्रगती ऐसे मूल्यहीन वातावरण में देश कों उन्नत नहीं बना सकती |  फिर हुआ भावपूर्ण एकल गीत | ‘बोधयित्वा संघभावं, नाशयित्वा हीनभावं..नवशताब्दे कलियुगाब्दे, हिंदुधर्मो विजयताम्’ |

शीतल मलयसमीरों के साथ सायंकाल के प्रकाश में गीत की उत्कट स्वरलहरें वातावरण कों और भावविभोर बनाती चली | परमपूजनीय सरसंघचालक जी का उद्बोधन सुनने के लिए सभी आतुर थे |

‘हिंदू दहशतवाद’ यह एक भ्रामक संकल्पना है, कारण ये दो शब्द परस्परविरोधी है | पहले ‘हिंदू दहशतवाद’ शब्दप्रयोग हुआ, फिर जबरदस्त प्रतिक्रिया पाने पर उसे ‘भगवा आतंकवाद’ कहा गया, और अभी वह बदल कर ‘बहुसंख्यक आतंकवाद’ यह शब्दप्रयोग प्रचलित करने का षड्यंत्र चल रहा है | पाकिस्तान ने भी कभी नहीं कहा यहाँ के जनता के बारे में, वह काँग्रेस कह रही है | ‘हिंदू’ को कभी अमरीका, रशिया, युरप में दहशतवादी नहीं कहा गया, परन्तु काँग्रेस ने करार दिया | इससे भारत की आतंकवाद विरोधी लढाई में बाधा आ सकती है, ह कमजोर हो सकती है | राज्यकर्ताओं पर जब कुर्सी बचाने का संकट आता है, तो वे संघ कों निशाना बना देते है, यह तो इतिहास है | संघ स्वयंसेवकों जैसे सुशील, सच्छील, सुसंस्कृत लोगोंके सिवा और किसको बली का बकरा बनाया जा सकता है? परन्तु  हिंदुत्व के विरोध में आनेवालों का जो होता है वही इनका भी होगा ऐसा उन्होंने इतिहास का स्मरण कराते हुए कहा |

विश्व में विकास हुआ है | सुख मिलता है, परन्तु समाधान नहीं | हिंदू जीवनदर्शन और हिन्दुस्थान की ओर विश्व निहारता है तो समाधान और शांति का मार्ग ढूंढने के लिए | हिंदुत्व ही विश्वबंधुत्व और शांति के पथ पर मनुष्यता को अग्रेसर बना सकता है | विश्व एक हो रहा है, कारण वह एक ‘ग्लोबल मार्केट’ बना है, ऐसा पश्चिमी चिंतन है, परन्तु हिंदुत्व “अयं निजः परो वेति, गणना लघुचेतसाम्, उदारचरितानां तु, वसुधैव कुटुम्बकम्” का उद्घोष युगों से करता आ रहा है | विश्व में ‘सक्सेस स्टोरी’ में लिखा जाता है, “he came, he saw and he conquered”, उसके आगे क्या? आगे क्या होना है, “he came, he saw and he conquered and then one day, he died!” परन्तु हिंदू चिंतन ही बताता है की विश्व और संसाधन केवल उपभोग की वस्तू नहीं, अपितु कुछ देने की, और त्याग की अपेक्षा करता है | स्वामी विवेकानंद जी ने भी कहा था की हिंदू को भगवान शंकर जी जैसे स्वयं विष प्रशन कर औरों को सुरक्षित रखने की लोककल्याणकारी भूमिका निभानी है | संत ज्ञानेश्वर ने अपने पसायदान में जो विश्वमंगल की प्रार्थना की है उसी को लेकर संघ चलता है | और इन सभी कारणों के लिए हिंदू का सुसंगठित होना आवश्यक है | संघ का कार्य ईश्वरी कार्य है, यह विश्वास सभी के मन में है, और उसी दृढता के साथ हम आगे बढते हैं |











संदर्भ :-




      2.  www.hssuk.org
      3.  www.sanghparivar.org
      4.  www.geetganga.org

Monday, January 3, 2011

Dr. Binayak Sen : wait & watch.

Chhattisgarh Court sentenced Dr. Binayak Sen life imprisonment over charges of sedition. Court linked Dr. Sen to Maoist movement and his active participation in their communications. After the judgment came out, there was great hue and cry nationwide. Not only our human rights organizations and intelligentsia thronged to condemn, criticize and question the verdict, but also international organizations.

We did not see such media hype to hang Afzal, who is sentenced to death by the Supreme Court. The savage beast is still in jail waiting for either natural death or for rescue and return in exchange with hijacked plane. No human rights organizations, national or international, coming forward in demand of punishment to such a gross violator of human rights.

A new trend of ‘media trial’ is evident in cases like Narendra Modi, Sohrabuddin, Ishrat Jahan, Swami Lakshmanand Saraswati in Kandhmal etc. Media is considered as fourth pillar of democracy. But it seems involved in carrying out a function which it is not supposed to. The judiciary is sufficient to try a person. Media is to recognize, report, track and trace. Instead media gives its own certificate of ‘innocence’ or ‘guilt’. Why media boasts its opinion on viewers? We very well know who handles the media and how. These handlers have made news agencies puppets in their hands. For this reason the media has forgotten its functions and instead it is focusing on their feeders to facilitate their fictions.

Also, the role of international organizations is worth taking note. The Amnesty International which presents itself as a champion and custodian of Human Rights, has condemned the verdict saying, Amnesty International has repeatedly called on the Indian authorities to immediately drop all the charges against Dr Binayak Sen.” In international politics such institutions/organizations are called as ‘non-State actors’. But States keep a strong hold over these for fulfilling their own motives behind the curtain. Bharteey Court has given its verdict over serious charges of seditious activities. It relied on Chhattisgarh Special Public Safety Act, 2005, and the Unlawful Activities Prevention Act, 2004. Amnesty has nothing to do with that as it is internal matter of a nation concerning its security and sovereignty. So, the largest democracy and its judiciary will see to it. Amnesty has a great scope for its noble work in the ‘middle-east’ Asia, China, Korea, Afghanistan, Israel, Jordan, Australia etc. We should not yield to pressure tactics of these ‘non-State actors’. This depends on how strong Government we have and its willpower to keep such players at bay.

We have single integrated judicial system. This refers to hierarchy of Courts. Now a Court has given its verdict depending upon the facts and evidences brought before it. Aggrieved party may very well appeal to higher Court. They have that legal remedy available. Infact Dr. Sen’s mother has moved or resolved to move higher Court. She should be helped with proper aid and assistance to pursue the battle.

Therefore, taking extremes of ‘innocence’ or ‘guilt’ should be avoided. Let the judiciary work and let the truth prevail.

Saturday, January 1, 2011

महाराष्ट्र 'डीग्रेड"

पूर्वीच्या एका लेखात राजकारण्यांची, नेत्यांची नावे घेऊन स्पष्ट लेखन केले होते. त्यानंतर लगेचच ब्लॉग ‍‌हॅक झाला. अर्थात या दोन गोष्टींचा परस्परसंबंध कितपत असेल हा भाग वेगळा. परंतु जेव्हा अनेकांनी ईमेल करून, ‘कृपया नावे घेऊन घाणीत दगड मारण्यापेक्षा केवळ सूचक लेखन करावे, त्यातून नावे कळतातच’ हा भाव व्यक्त केला. तेव्हापासून शक्यतो व्यक्तींचे नाव न घेता लेखनाचा प्रयत्न.

दादोजी कोंडदेवांचा पुतळा लाल महालातून कापून काढण्याचा ठराव काही करंट्यांनी पुणे महानगरपालिकेत संमत केला. आणि त्यानुसार कार्यवाहीसुद्धा केली. दादोजी शिक्षक होते की नव्हते याहीपेक्षा ते कोणत्या जातीचे होते यावरून हा सारा प्रकार घडला आहे. वेडगळपणाची झाक असलेल्या काही नतद्रष्ट संघटना याच्यामागे आहेत. जातीय विद्वेष पसरवणे हेच ज्यांचे उद्दिष्ट आहे अशांकडून महाराष्ट्राला ‘Dgrade’ करणाऱ्या अशा घटना न घडल्या तरच नवल! ‘अठरापगड जातींना एकत्र करणाऱ्या’ हिंदूनृसिंहाच्या राज्यात असे लांडगे राज्यावर यावेत आणि त्यांनी हैदोस घालावा यापरते दुर्दैव कोणते?

आश्चर्य वाटते ते प्रत्येकाच्या भूमिकेचे. या लांडग्यांना विरोध करून पळता भुई थोडी करणे कठीण नव्हते. कित्येक जणांकडे अशी शक्ती आहे. सर्वप्रथम या राज्याचे शासन! पण ते स्वतःच जर जातीवर आधारलेले असेल तर अपेक्षा ठेवणेच फोल आहे. काहीजणांनी तर जाळपोळीचे ‘आदेश’च दिल्याचे ऐकिवात येते आहे. ‘अमुक ठिकाणी बसेस जाळा, दगडफेक करा, म्हणजे तणाव निर्माण होईल इ.’ कोंडदेव राहिले बाजूला! अर्थात असे ‘काळे-गोऱ्हे’ प्रत्येकच पक्षामाजी असतात! त्यांच्याकडे पोळ्या तयारच असतात..सामान्यांचे आणि कार्यकर्त्यांचे जळण घातले की झाली पोळी भाजून तयार! बाबासाहेब पुरंदऱ्यांना व्यासपीठावर हौसेने बसवणारे, कौतुक करणारे गप्प का? आम्ही बाबासाहेबांनी, गोनीदांनी, सरदेसायींनी सांगितलेला शिवेतिहास वाचत-ऐकत मोठे झालो. दादोजी कोंडदेव होतेच गुरु शिवरायांचे. पण कुठे आहेत बाबासाहेबांचे शिलेदार? एरवी राष्ट्रीयत्वाचा विचार करणाऱ्या आणि हिंदुत्वाचा हुंकार भरणाऱ्या काही स्वयंसेवी संघटनांनी या दुर्दैवी प्रकाराबद्दल एखादे निषेधाचे पत्रक काढल्याचेही ऐकिवात-पाहण्यात आले नाही (निदान माझ्यातरी!) याचेही सखेद आश्चर्य वाटते.

नगरपालिकेत ज्यांनी हा ठराव मांडून संमत करून घेतला त्यांना भ्रष्टाचार, अनागोंदी यावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवायचे आहे हे स्पष्ट आहे. तेव्हा जणू पापाचे शेवटचे काही घडे राहिलेत आणि तेही वेगाने भरण्याची सुरुवात केलेली दिसते. वाट पाहायची आता यांना त्यांची जागा दाखवण्याची.

तेव्हा सध्या आपण काहीच करू शकत नाही. खोली बंद करायची, महाराजांच्या तेजस्वी मुद्रेसमोर म्लानमुखाने नतमस्तक व्हायचे, दादोजींसाठी दोन अश्रुफुले वाहायची आणि आत खोलवर रुतलेला बाण मूकपणे सलत ठेवायचा...

Saturday, December 25, 2010

Housebreaking : Crime & Time.


While reading Indian Penal Code, 1860 (hereinafter referred to as IPC or the Code), I found something bit interesting. The whole Code is interesting, very carefully drafted and an example of exhaustive statute. IPC includes offences and punishments. It is so much inclusive that it lists not only common offences like theft, robbery, dacoity, rape, abduction, kidnapping but also some unthinkable offences like ‘Fouling water of public spring or reservoir’ (Sec. 277) and Erasure of mark denoting that stamp has been used’ (Sec. 263) etc. For common readers I wish to provide these two offences from the Code.

277. Fouling water of public spring or reservoir.—Whoever voluntarily corrupts or fouls the water of any public spring or reservoir, so as to render it less fit for the purpose for which it is ordinarily used, shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to three months, or with fine which may extend to five hundred rupees, or with both.

263. Erasure of mark denoting that stamp has been used.—Whoever fraudulently or with intent to cause loss to Government, erases or removes from a stamp issued by Government for the purpose of revenue, any mark, put or impressed upon such stamp for the purpose of denoting that the same has been used, or knowingly has in his possession or sells or disposes of any such stamp from which such mark has been erased or removed, or sells or disposes of any such stamp which he knows to have been used, shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to three years, or with fine, or with both.

So the Code provides definitions of offences and punishments for it. Now coming to the interesting part for which I wished to write this piece.


Sec. 445 talks about ‘Housebreaking’.

445. Housebreaking.—A person is said to commit “housebreaking” who commits house-trespass if he effects his entrance into the house or any part of it in any of the six ways hereinafter described; or if, being in the house or any part of it for the purpose of committing an offence, or, having committed an offence therein, he quits the house or any part of it in any of such six ways, that is to say:—

Now let us not go into those six ways, as that will be out of context. After this, Sec. 446 speaks of the same offence but done ‘by night’.
446. Housebreaking by night.—Whoever commits housebreaking after sunset and before sunrise, is said to commit “housebreaking by night”.

We clearly see two different Sections viz. Sec. 445 and Sec. 446, bearing difference only of time. Punishments for these offences are provided in Sec. 453 and Sec. 456 respectively.

453. Punishment for lurking house-trespass or housebreaking.—Whoever commits lurking house-trespass or housebreaking, shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to two years, and shall also be liable to fine.

456. Punishment for lurking house-trespass or housebreaking by night.—Whoever commits lurking house-trespass by night, or housebreaking by night, shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to three years, and shall also be liable to fine.

So, it can be clearly seen that Sec. 453 demands punishment of imprisonment which may extend to two years and fine. But Sec. 456 demands punishment of imprisonment which may extend to three years and fine. For the same offence, done by night, imprisonment may be for 3 years. The question here is ‘can time magnitude only change the severity of punishment’? Or will the punishment depend upon the time when the crime is committed? Theft is theft, done in days’ time or by night. Equal punishment is there. Time cannot change the punishment. If you do ‘housebreaking’ by day you will be punished of imprisonment upto 2 years, but same if you do by night, you may be punished to 3 years. In other words, ‘housebreaking’ by day has smaller punishment. Housebreaking before night (before sunset and after sunrise) may save you one year in jail! Also, one can start the ‘procedure’ of housebreaking by evening and carry on it till the Sun sets. Then rests for the Sun to rise, and then again begins his ‘work’ to complete it. If at all he is caught, then what should be done?      He will need a good lawyer!

When I talked about it to a former Commissioner of Police (CP) of Mumbai, he told me that there are chances of other things and effects in the night. He also pointed out such Sections in The Police Act. Quantity of suspicion is more by night. Some lawyers also told me that circumstances at night are different and therefore the difference in punishment. But I still feel that punishment should be for crime/offence. And not be dependent on the time factor.  If he does something more at night owing to other things and circumstances, he may be very well punished for those additional things. But for equal offence, done in any quarter of the day (or night) he should be punished equally.

A probable reason, I think may be, person gets benefit of the darkness and unpeopled or lonely places. But again then other crimes also have benefit of such circumstances. Not much depends on it. Just found it to be interesting and worth sharing.


Saturday, December 18, 2010

व्यथा धनगरवाडीची ...

गोष्ट आहे दूरदूरची. अगदी डोंगरापल्याडची. आपल्या महाराष्ट्राच्या नकाशावर आहे सिंधुदुर्ग जिल्हा. तिथे कुडाळ नावाचे शहर बनू पाहणारे विकसनशील केंद्र. आणि त्याच्यापासून सुमारे १२ किमी वर आहे ‘तेंडोली’ नावाचे गाव. त्यातली ‘कुमणोस’ नावाची वाडी.

‘तेंडोली’ गावच्या त्या कुमणोस वाडीपर्यंत एस.टी. ने जायचे. तिथून पुढे दुचाकीने डोंगराच्या पायथ्याशी. डोंगर पूर्ण चढून जायचा. मग लागतात काही प्लॉट्स आंबा-काजूची लागवड असलेले. तेही संपल्यावर पुढे पठारावर चालत जायचे साधारण किलोमीटरभर. त्या विस्तीर्ण माळावर आहे ‘धनगरवाडी’. धनगरांची घरं, गुरं आणि शेळ्या. सुमारे ११ घरं. आणि ५६ लोकसंख्या. त्यात शिक्षण घेत असलेली ८-१० जणं! 


प्रत्येक घरासमोर तुळशीवृंदावन. अंगावर कांबळ घेतलेले धडधाकट धनगर पुरुष आणि आतिथ्याचं लेणं ल्यालेला धनगर स्त्रिया तुमच्या स्वागताला सिद्ध असतात. लगेचच आसपासची १०-१५ कच्चीबच्ची जमा होतात. मग तुम्ही एखाद्या घरात बसल्यावर ती दरवाज्याआडून, भिंतींआडून पाहत असतात. तुम्ही थकला असणार हे धनगर जाणतो. मग प्रवासाचा शीण घालवण्यासाठी शीतल पाणी. सोबत चहाची विचारणा. तुम्ही आसपास नजर फिरवत नाही म्हणणार. तरीही ते आग्रहाने चहा ठेवायला सांगणार. इथे सापडेल खरा ‘अतुल्य भारत’!



घरामध्ये तुम्हाला दिसणार दिवे, विजेचा ‘मेन स्विच’. पण त्या सर्वाचा काहीच उपयोग नाही. आणि हीच व्यथा आहे धनगरवाडीची! इथे अजून वीज नाही. भारत स्वतंत्र होऊन झाली ६० वर्षे. आणि धनगरवाडीने घरात स्विचेस, दिवे बसवून झाली ७ वर्षे. प्रतीक्षा विजेची. मूकपणे, सहनशीलतेने ७ वर्षे वाट पाहतोय धनगर विजेची. सध्या रात्री प्रकाश देणारा एकमेव सौरदीप सोडला तर तिथे वीज नाही.

आता तुम्ही विचार करू लागता कारणांचा. ५६ एवढी लोकसंख्या असलेली ही वस्ती भटके-विमुक्त या सदरात मोडणारी नाही; स्थायी आहे. घरात आवश्यक अशी सर्व न्यूनतम विद्युत उपकरणं बसवून झालीत. मग का नाही वीज आली इथवर? चौकशी केली तर अनेक कारणं ऐकायला मिळतील. पण शोधावा लागेल तो उपाय!

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमधे इथली लोकसंख्या मोजली जाते ती ‘इतके मतदाता’ अशी. वीज आली तर पुढच्या निवडणुकीत आश्वासन कसले देणार? त्यामुळे वीज न येण्यातच शहाणपण आहे हे राजकारणी जाणून आहेत अशी बतावणी काहीजणांकडून होते. तर काहीजण म्हणतात की जिथून ‘लाईन’ जाणार आहे तिथले काहीजण ‘पोल’ टाकायला देत नाहीयेत. कारण त्या जमीन मालकाची पोल टाकू देण्याच्या बदल्यात काही ‘अपेक्षा’ आहे. आणि ती विच्छा पुरी करणार कोण? धनगर तर ही इच्छा पुरी करण्यास असमर्थ आहे. काहीजण म्हणतात आता दोनेक महिन्यात येईल वीज. पण असे दोनेक महिने सात वर्षांपासून येताहेत आणि जाताहेत. मॉल्समध्ये चकचकाट आहे, पण इथे मात्र रखरखाट आहे.

आपण आपल्या परीने ह्या वस्तीला उजाळून टाकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपली शक्ती-युक्ती, वजन-ओळख वापरून अशा दुर्गम भागांसाठी झटायला हवे. वीज येणे हे धनगरांच्या नाही तर आपल्या हातात आहे. वीज येणे अगदीच दुरापास्त दिसले तर किमान अजून काही सौरदीप लागण्यासाठी तरी प्रयत्न करावे लागतील. एखादी कॉर्पोरेट कंपनी अन् तिचे CSR डिपार्टमेंट यांच्यासाठी तर हा डाव्या हाताचा मळ आहे.

इथले विजेवर चालणारे दिवे लागलेले नसले तरी त्यांच्या डोळ्यातले आशेचे दिवे अजूनही विझलेले नाहीत. पण उशीर नको व्हायला.

Sunday, December 12, 2010

The Ballad of Father Gilligan

The Ballad Of Father Gilligan

The old priest Peter Gilligan
Was weary night and day;
For half his flock were in their beds,
Or under green sods lay.

Once, while he nodded on a chair,
At the moth-hour of eve,
Another poor man sent for him,
And he began to grieve.

'I have no rest, nor joy, nor peace,
For people die and die';
And after cried he, 'God forgive!
My body spake, not I!'

He knelt, and leaning on the chair
He prayed and fell asleep;
And the moth-hour went from the fields,
And stars began to peep.

They slowly into millions grew,
And leaves shook in the wind;
And God covered the world with shade,
And whispered to mankind.

Upon the time of sparrow-chirp
When the moths came once more.
The old priest Peter Gilligan
Stood upright on the floor.

'Mavrone, mavrone! the man has died
While I slept on the chair';
He roused his horse out of its sleep,
And rode with little care.

He rode now as he never rode,
By rocky lane and fen;
The sick man's wife opened the door:
'Father! you come again!'

'And is the poor man dead?' he cried.
'He died an hour ago.'
The old priest Peter Gilligan
In grief swayed to and fro.

'When you were gone, he turned and died
As merry as a bird.'
The old priest Peter Gilligan
He knelt him at that word.

'He Who hath made the night of stars
For souls who tire and bleed,
Sent one of His great angels down
To help me in my need.

'He Who is wrapped in purple robes,
With planets in His care,
Had pity on the least of things
Asleep upon a chair.'

--- W. B. Yeats

देवाच्या अस्तित्वाचा होणारा अनुभव तरल शब्दात यीट्सने चितारला आहे. मी त्याच्या भावार्थ (स्वैरानुवाद) देण्याचा प्रयत्न केलाय. शब्दशः नाही. पोस्ट चा उद्देश केवळ रसास्वाद घेणे आहे.  फादर गिलिगन नावाचा एक मिशनरी एका गावात राहत असतो. त्या गावात मृत्यूचं तांडव सुरु असतं. आणि दरवेळी अंतिम प्रार्थनेसाठी (/कबुलीजबाबासाठी-Confessions) ह्या फादर गिलिगन ला बोलावलं जात असतं. तो नुकताच एका ठिकाणाहून येऊन खुर्चीवर रेलतो तोच अजून एक गरीब माणूस बोलावणं घेऊन येतो. फादर थकलेला, कंटाळलेला असतो. तो म्हणतो,

'I have no rest, nor joy, nor peace,
For people die and die';
“लोकं नुसती (एकामागून एक) मरतायत्..त्यामुळे मला ना विश्रांती, ना आनंद, ना शांती!” आणि असा खेद व्यक्त केल्याकेल्या तो लगेच उपरती होऊन म्हणतो,

And after cried he, 'God forgive!
My body spake, not I!'
“देवा मला माफ कर...माझे (थकलेले) शरीर म्हणाले..मी नव्हे”! 
समाजकार्यात, ईश्वरी कार्यात व्यग्र असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या, प्रचारकांच्या जीवनात थकवा, कष्ट, वेदना हे अपरिहार्य आहे. पण  अशावेळी या ओळी बलदायी आहेत.
पुढे एवढं म्हणून त्याला खुर्चीतच झोप लागते. संधिप्रकाश कमी होऊन रात्र पसरू लागते. तारे आकाशात उगवतात. आणि काही वेळाने त्याला अचानक जाग येते. त्याला आठवतं की आपल्याला एका घरी जायचं अजून राहून गेलंय. तो त्याच्या घोड्याला झोपेतून उठवतो... आणि वेगाने निघतो. त्या घराजवळ पोहोचताच बाई दार उघडतात आणि म्हणतात, 'Father! you come again!'. फादर ला हा धक्काच असतो. ही ओळ मला मध्यवर्ती वाटते. फादर विचारतो, 'And is the poor man dead?'. त्यावर त्याला उत्तर मिळतं की तो माणूस तर तासाभारापूर्वीच गेला. बाई म्हणतात, “तुम्ही (प्रार्थना करून) गेलात आणि त्यानंतर तो लगेच अगदी आनंदी पक्ष्याप्रमाणे मुक्त झाला”.

फादर गुडघे टेकतो आणि म्हणतो, “ज्याने ही ताऱ्यांनी चमचमणारी रात्र बनवली त्याने माझ्या गरजेच्या वेळी मदतीसाठी एक देवदूत खाली धाडला”. आणि शेवटची ओळ मुळातूनच वाचण्यासारखी आहे. त्याचा अनुवादसुद्धा नको!

'He Who is wrapped in purple robes,
With planets in His care,
Had pity on the least of things
Asleep upon a chair.'