"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Friday, October 9, 2009

वनवासी कल्याण आश्रम

भारतामध्ये शहरी आणि ग्रामीण लोकसंख्येबरोबरच एक मोठा वर्ग आज गिरिकन्दरी राहतो आहे. वाहतूक व्यवस्था तर नाहीच परंतु मानवी जीवन सुसह्य बनविणार्या कोणत्याच यांत्रिक वस्तू नाहीत. प्राथमिक वैद्यकीय व्यवस्था, औषधे, कपडे यांचा अभाव आणि शिक्षण वगैरे तर दूरच. अशा आदिम अवस्थेत राहणारा हा वर्ग भारतात 'आदिवासी' म्हणून ओळखला जातो. गिरिशिखरी राहून कंदमुळं, फळं अशा गोष्टी खाऊन काबाडकष्ट करून उपजीविका चालविणारा आणि कधी बाह्य जगाशी संबंध आलाच तर बव्हंशी फसवला आणि नाडला जाणारा समाज!

आधी या समाजाला 'आदिवासी' म्हणणेच चूक आहे. कोण आधी कोण नंतर राहावयास आले, असा विचार केला तर मग शहरातीलही बरेचजण 'आदिवासी' होतील! म्हणूनच शहरवासी, ग्रामवासी ह्याप्रमाणे वनात राहणारे ते 'वनवासी'. त्यामुळे 'आदिवासी' या शब्दाऐवजी 'वनवासी' शब्दच आपण वापरला पाहिजे. जेव्हा या वनवासी बांधवांचा विकास होईल तेव्हा समग्र समाजाच्या विकासाचे स्वप्न पूर्णत्वाच्या जवळ जाईल, कारण हा समाज पोहोचायला खूप कठीण आहे आणि म्हणून अंतिम घटकांपैकी एक आहे.

वनवासी हे निसर्गपूजक आहेत. वृक्ष, नाग, सूर्य, नदी ह्यांना ते देवता मानतात. त्यादृष्टीने ते पूर्णपणे हिंदूच आहेत. परंतु ’तुम्ही हिंदू आहात’ असं जाणीवपूर्वक सांगायला कोणी गेलं नव्हतं. जेव्हा ख्रिश्चन मिशनरी या देशात आले आणि आपले सावज शोधू लागले तेव्हा हे वनवासी त्यांच्या नजरेतून सुटले असते तरच नवल! त्यांनी वनवासी बांधवांना सुविधा दे‌ऊ केल्या व बदल्यात ख्रिश्चन मत त्यांच्यावर लादले.

अशाप्रकारचे दुर्भाग्यपूर्ण मतपरिवर्तन सुरु असतानाच बाळासाहेब देशपांडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून मध्य प्रदेशात काम करत होते. त्यांना जो प्रदेश दिला होता त्यातील जशपूर या ठिकाणी अशी उपासना पद्धतीची चाललेली विक्री त्यांनी हेरली. या समस्येवर उपाय म्हणून त्यांनी वनवासी कल्याण आश्रम या संस्थेची स्थापना १९५२ साली केली. वनवासी बंधूंची उन्नती आणि त्यांची मूळ उपासनापद्धती टिकवून ठेवणे ही आव्हाने समोर ठेवून वनवासी कल्याण आश्रम कामाला लागली. या कामी त्यांना जशपूरच्या राष्ट्रीय दृष्टिकोण असलेल्या महाराजांचे फार सहकार्य झाले.

हळुहळू आश्रमाचे कार्यक्षेत्र वाढू लागले. समाजातील सज्जनशक्तीचे सहकार्य लाभू लागले. आणि वनवासी कल्याण आश्रमाने एका नव्या पहाटेची निश्चिती केली. रा. स्व. संघाचे स्वयंसेवक, प्रचारक, व.क.आ चे कार्यकर्ते या सर्वांमुळे आज प्रचंड मोठ्या प्रमाणावर देशभरातील दुर्गम भागांमध्ये काम सुरु आहे. त्याचे संख्यात्मक विवरण पुढे दिले आहे. सद्यस्थितीत ३१५ हून अधिक जिल्ह्यांत , १०,००० हून अधिक ठिकाणी आश्रमाचे काम सुरु आहे. यात शेकडो पूर्णवेळ कार्यकर्ते समर्पित वृत्तीने काम करत आहेत. आजच्या घडीला महाराष्ट्रात पुढील प्रमाणे काम सुरु आहे-

शैक्षणिक प्रकल्प-वसतिगृहे - १९, प्राथमिक शाळा - २, माध्यमिक शाळा - २, बाल संस्कार केंद्रे - १२

लाभार्थी - १,६००

आर्थिक विकास प्रकल्प-औद्योगिक शिक्षण केंद्र - २८, शेतकी प्रकल्प - ४, बचत गट - ५५८

लाभार्थी - १६,०००

आरोग्य प्रकल्प-साप्ताहिक आरोग्य केंद्रे - ४, दैनिक केंद्रे - १, आरोग्य रक्षक - ५८६

लाभार्थी - ४,००,०००

खेलकूद केंद्रे - १५

श्रद्धा जागरण केंद्रे - ६०

एकूण प्रकल्प १,१२३

पूर्णवेळ कार्यकर्ते ८१ - ६५ पुरुष, १६ महिला.

वनवासी कल्याण आश्रमाला सहकार्य करण्यासाठी आपण या लेखाला प्रतिसाद देऊ शकता.



7 comments:

  1. Jahirat! Ani ti pan khas sanghiy bhashet. dongarat nahi girikandarat. Shekado purnavel karyakarte asa shabdaprayog ani akadevarit purnavel karyakarte 85.

    ReplyDelete
  2. Mala hyatun kahich fayda nahi ani 'jahirat' karnyacha prashnach nahi. changle chalalele kam lokanparyant pohochave hach ekmev uddesh theun he lihile aahe.
    'Shekdo' poornvel kaarykarte Bhartat aahet. ani akdevari Maharashtrachi dili aahe.
    tyatil khuspat na kadhta kam baghuya...

    ReplyDelete
  3. Vikram dear have some patience! we are not expecting explanations and are just putting comments on your posts! so don't rush to explain and relax !!!What you want to say is already there in your post;so now it's our turn to write!!!
    Ok ; I think you got the point?!!
    असो उत्तम चालु आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा तसेच चालतच रहावे म्हणुन!

    ReplyDelete
  4. Insha Allah!!!!!!!!!
    vah Vikram bahot khub.........

    ReplyDelete
  5. Mitra aaple he chagle kam lokanparyant pohchvinyasathi ha navin marg hi khup changla aahe.....Abhinandan

    ReplyDelete
  6. khup chan saglyanich jamel tashi madat ani vel dila tar ajun chan mhanta yeel nahi ka?

    ReplyDelete
  7. उपक्रम चांगला आहे. चिनी वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यापेक्षा आपल्या शासनाने, विविध संस्था करीत असलेल्या वस्तूंना (राखी, कंदील, भेटकार्डे वा अन्य रोज वापरावयाच्या वस्तू) वर्षभर बाजारपेठ उपलब्ध करुन द्यायला हवी असे वाटते.

    ReplyDelete