"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Sunday, August 12, 2012

इस्लामी दहशतवादाचा भेसूर चेहरा.


आसाममध्ये चाललेला हिंसाचार हा जरी भारतीय विरुद्ध बांगलादेशी असा असला तरी तो आसामी हिंदू विरुद्ध बांगलादेशी मुसलमान असा आहे हे आता लपून राहिलेले नाही. मुसलमान केवळ इस्लाम च्या नावावर एक होतो हे जागतिक सत्य पुन्हा एकदा अनुभवायला मिळालेलं आहे.

मुंबईत काढलेल्या गेलेल्या मोर्चाला ‘हिंसक वळण लागले’ वगैरे गोंडस शब्द वापरून डोक्यावरून चादर ओढून घेण्याचे काम वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या आणि त्यांच्यावर देवापेक्षा अधिक विश्वास असलेला सामान्य हिंदू करणार आहे. पण ही रात्र वैऱ्याची आहे.

‘काश्मीर ला स्वतंत्र करणार’, दिल्ली उच्च न्यायालयाबाहेर झालेल्या स्फोटाला कारणीभूत असणारे अतिरेकी काश्मीरमध्ये मारले गेल्यावर ‘त्यांना वीरमरण आले, असे अनेक वीर तयार होतील’, ‘एक दिवस दिल्लीला काश्मीरमधून माघार घ्यावी लागेल’ ही सर्व वक्तव्ये आहेत सय्यद गिलानीची. आणि त्याने ती श्रीनगर हून केली आहेत. त्याच अतिरेक्यांच्या दफनविधी वेळी. त्याच्याविरुद्ध भारत सरकारने काहीही केले नाही.

दुसऱ्या घटनेमध्ये एका दिल्लीस्थित उच्चपदस्थ आय.ए.एस. अधिकाऱ्याच्या मुंबईत राहणाऱ्या पल्लवी पुरकायस्थ या २५ वर्षीय वकील तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न झाला आणि तिने विरोध केल्याने तिला मारून टाकण्यात आले. तो होता सज्जाद अहमद मुघल. काश्मीरहून आलेला मुसलमान. त्याने सुरक्षा एजन्सी कडे आपला पत्ता ‘लाल चौक, श्रीनगर’ एवढाच दिला होता. आणि तो इमारतीवर सुरक्षा रक्षक होता. असे अनेक मुघल बांगलादेश, पाकिस्तान इथून येऊन भारतात राहत आहेत. तुमच्या आमच्या इमारतीवर सुरक्षा रक्षक आहेत, बांधकामावर आहेत, दुधात भेसळ करत आहेत, बनावट चलन आणत आहेत. आणि मुख्य म्हणजे एका मोठ्या कटाचा भाग आहेत, ज्याचे नाव मुघलीस्तान अथवा दार-उल्-इस्लाम.

तिसरी आणि महत्वाची घटना म्हणजे आझाद मैदानातील देशद्रोही जमावाने केलेली दंगल. बांगलादेशातून आसाममध्ये घुसखोरी केलेल्या मुसलमानांना बोडो हिंदूंनी जीवावर उदार होऊन चोप दिल्याने तिथली परिस्थिती काहीशी बिकट झाली. अनेक वर्षे संयमितपणे वाट पाहूनही काहीच होत नाही हे पाहून बोडोंनी दोन घेतले दोन दिले या भूमिकेतून स्वतःच लढायला सुरुवात केली, जी प्रतिक्रिया बांगलादेशी मुस्लिमांना अनपेक्षित होती.

देशभर याची प्रतिक्रिया उमटली. प्रसारमाध्यमांनी गुजरात दंग्यांच्या वेळी जेवढे रान उठवले होते त्या तुलनेत आसामचे वृत्त फारच तुरळक प्रमाणात आले. बोडोंना विश्व हिंदू परिषद, सेवाभारती यांनी मदत पोहोचवायला सुरुवात केली. आजही कित्येक बोडो घरेदारे जळल्यामुळे, लेकी-बाळी नासवल्या गेल्यामुळे निर्वासित छावण्यांमध्ये राहात आहेत. आणि अजूनही मुसलमानांचे सेनादलाच्या जवानांवर, पोलिसांवर हल्ले चालूच आहेत.

मुंबईत ‘रझा अकॅडमी’ आणि अन्य कट्टरपंथीय मुस्लीम संघटनांनी एका दंगलीचे आयोजन आझाद मैदानात केले होते. अण्णा हजारेंना काहीच दिवसांपूर्वी आझाद मैदानात उपोषणाची परवानगी नाकारली गेली होती. पण मुंबई पोलिसांनी अर्थातच राजकीय दबावाखाली उपरोल्लेखित संस्थांना ती परवानगी दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते सरळच या दंगलीला कारणीभूत असल्याचे दिसते आहे. त्यांच्याच सांगण्यावरून पोलिसांनी परवानगी दिली. जेव्हा इराकवर अमेरिकेने हल्ला केला तेव्हाही याच देशद्रोही मुस्लीम संघटनांनी असाच हिंसक प्रकार केला होता ज्यात महापालिका मुख्यालय, छत्रपती शिवाजी रेल्वेस्थानक, अशा ठिकाणांवर दगडफेक केली होती. पण तरी त्या संस्थेवर ना बंदी आली, ना त्यांच्याकडून नुकसानभरपाई घेण्यात आली. आणि काल ११ ऑगस्टला इस्लामचा खरा चेहरा पुन्हा एकदा पाहायला मिळाला.

मोर्चात प्रक्षोभक भाषणे चालू होती, सतत आसाममधल्या घुसखोर बांगलादेशी मुस्लिमांची बाजू घेण्यात येत होती, त्यांच्यावर अत्याचार चालू असल्याचे चित्र भासविण्यात येत होते. आणि जमावाला गरम करण्यात येत होते. गर्दी वाढत होती. सर्वांना एकाच माहिती होते – ‘इस्लाम खतरे में है |’ आणि त्यामुळे दंगा करायला जमाव उत्सुक आणि उतावीळ झाला होता. काही ठिकाणी तर असे वृत्त आहे की कालच्या प्रकारासाठी गेले काही दिवस मशिदीतून ‘प्रबोधन’ करण्यात येत होते. आणि दीन दीन म्हणत जसे यवन तुटून पडत असत तसाच प्रकार काल अनुभवायला मिळाला. अत्रेंच्या कवितेतल्याप्रमाणे ‘हैदोस दुलाबे धुल्ला’ सुरु झाला. लोकांनी केवळ डोक्यात भरूनच नव्हे तर हातातूनही दगड आणले होते. काठ्या होत्या. जाळपोळ आणि तोडफोड सुरु झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह ५२ पोलीस जखमी झाले. कित्येक रक्तबंबाळ झाले. ३ पोलिसांच्या मोठ्या गाड्या चक्क जाळून टाकण्यात आल्या. पाच खासगी गाड्या-दुचाक्यांसह ११ गाड्या जाळल्या आणि ४९ बेस्ट बसेस ची तोडफोड करण्यात आली. ३ ओबी व्हॅन्स जाळण्यात आल्या. त्यातल्या एकात अमित खांबे आणि त्याचे २ सहकारी होते. जमाव बाहेरून ओरडत होता ‘मारो- जला दो’.. कसेबसे सगळे बाहेर पडले आणि जमावाने ती गाडी पेटवून दिली.

ह्या सर्व घटना वेगवेगळ्या नाहीत. त्या एका मोठ्या कटाचा भाग आहेत. जो काही गुप्त कट नाही. जे चीनच्या झिन्झियांग प्रांतात चालू आहे, जे इराक-इराण मध्ये चालू आहे, जे लंडन मध्ये, बेल्जिअममध्ये आणि पॅरिसमध्ये चालू आहे त्याच डिझाईनचा हा एक छोटा भाग आहे हे सर्वजणांनी समजून घेण्याची गरज आहे. बरबटलेले राजकीय पक्ष आणि नेते याविरुद्ध तर काही करणार नाहीतच किंबहुना तेच याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहाय्यक आहेत.

जे पोलीस जखमी झाले त्यांचे काय? त्यांच्या कुटुंबाचे काय? ज्या घरच्या लहान मुलाने त्याचे रक्तबंबाळ झालेले पोलीस वडील पहिले असतील त्याचे काय? ४९ बेस्ट बसेस जाळल्या. त्याचा खर्च हा उद्या तुमच्या आमच्या खिशातून जाणार आहे. तो रझा अकादमी आणि अन्य मुस्लीम संस्थांकडून वसूल करण्यात येणार का? एरवी साप-साप म्हणून भुई थोपटणारे मानवाधिकार वाले पुढे येणार का? कोर्ट याच्यावर स्वतःहून कृती करणार का? आझाद मैदानाजवळ ही दंगल सुरु केल्यावर एक आजोबा आणि त्यांचे २ लहान नातू जखमी झाले आणि घाबरेघुबरे होऊन धावतपळत दुकानाच्या आश्रयाला गेले. स्वतंत्र भारतात अशा भारतीयांना शांतपणे आणि आनंदाने जगण्याचा अधिकार नाही काय? उद्या आपल्या गल्लीत स्फोट घडणार आहेत. तुमची बहीण, प्रेयसी अत्याचारांना बळी पडणार आहे. तुमचा भाऊ, पती कामावरून घरी पोहोचेलच असे नाही. तुमच्या कामाच्या ठिकाणी दगडफेक, जाळपोळ वाटेल तेव्हा घडणार आहे. पोलीस आणि अन्य सुरक्षादले तुमच्या मदतीला धावून येईपर्यंत तुमचे शवसुद्धा सुरक्षित राहील की नाही अशी शंका आहे! मुसलमानांना जर शांततेने राहता येणार नसेल तर त्यांच्या या चिथावणीखोर नेत्यांना कोणी उद्या टिपून काढले तर आश्चर्य वाटायला नको. ही प्रक्रिया जगभर सुरु होणार आहे. आपली कबर वेगाने खणायला घेतलेल्या ह्यांचा अंत आधीच लिहून ठेवलेला आहे. जन्नत मिळवण्यासाठी सुंदर जगाचा नरक करणारे हे राक्षस निर्दाळून टाकावेच लागतील.


किंबहुना शिशुपाल स्वतःहूनच घडे भरणार असेल तर उद्या त्याच्या वधाचे नाट्य रंगल्यास अचंबा वाटायला नको. रात्र वैऱ्याची आहे...
 


Saturday, August 4, 2012

वाघ्या...




रायगडावर शिवाजी महाराजांच्या वाघ्या नावाच्या इमानी कुत्र्याची समाधी/स्मारक आहे. हा वाघ्या शिवरायांचा इमानी कुत्रा तर होताच परंतु शिवराय गेल्यानंतर या वाघ्याने त्यांच्या चितेत उडी घेऊन आत्मसमर्पण केले असे म्हणतात. ते शिवरायांच्या समाधीसमोर चे स्मारक काही समाजकंटकांनी उखडून टाकल्याचे वाचनात आले. हे समाजकंटक ‘संभाजी ब्रिगेड’ (संब्रि) या समाजविघातक संघटनेशी सबंधित असल्याचेही वृत्त आहे. लाल महालातील दादोजी कोंडदेवांचा पुतळाही यांनीच कापून काढला  होता. तेव्हा सध्या या संब्रि लोकांना फारच सराव झालेला आहे. तुमच्याही येथील काही जुनेपुराणे नासधूस टाकायचे असेल तर यांना अवश्य बोलवा.

गंमत ही आहे की, अशाप्रकारे राष्ट्रीयतेचे परिचायक असणारे पुतळे अथवा स्मारके काढून टाकून इतिहास बदलता आला असता तर बघायलाच नको होते. गुलामगिरीचे आणि अन्यायाचे चिन्ह मिटवायलाच हवे याबद्दल दुमत नाही पण आपली शक्ती अशाप्रकारे जर प्रेरणादायी इतिहास बदलायला कोणी लावणार असेल तर खचितच ते निंदनीय आहे.


मजेचा भाग असा की, एका निर्जीव कुत्र्याचे ब्रॉन्झ मधील शिल्प उखडायला कितीजण लागावेत? वृत्तानुसार पोलिसांनी आत्तापर्यंत संब्रि च्या ७३ जणांना पकडले आहे ज्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. आणि अजून २०० जण फरार/बेपत्ता आहेत. म्हणजे जवळपास २७५ जण लागले एका निर्जीव कुत्र्याची समाधी उखडायला? चांगलाच घामटा काढलास की रे वाघ्या! वाचूनच दया येते, की बिचारे २७५ भ्रमित तरुण आपला वेळ आणि आपली शक्ती आपल्याच इतिहासाची मानचिन्हे मिटवायला लावतात.

अरे तुम्हाला कार्यक्रम हवाच होता ना काही, तर अशा कित्येक गोष्टी आणि स्मारके आजही आपल्या उरावर बसून आहेत जी जेवढ्या लवकर नष्ट होतील तेवढे बरे, त्यासाठी वेळ घालायला हवा होता. मजहबाच्या नावावर राष्ट्रविघातक शिक्षण मिळणाऱ्या काही शिक्षणसंस्था(?) सरकारी अनुदान घेऊनच चालत आहेत. त्याला विरोध करा. तिथे जाऊन विरोध प्रदर्शन करा. आहे खरी खुमखुमी, तर आसामला जा आणि तुमच्या हिंदू बांधवांचे रक्षण करा. जम्मू-काश्मीरमध्ये जा आणि श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवा. एवढे लांब कशाला महाराष्ट्रातल्या खेडोपाडी हिंदू समाजातल्याच ठराविक वर्गाला हिणवले जाते आणि सार्वजनिक ठिकाणी पाणीही दिले जात नाही, तिथे तुमची शक्ती दाखवा. ‘लव्ह जिहाद’ च्या अंतर्गत तुमच्या आमच्या बहिणींना आज भयानक रीतीने जाळ्यात ओढून, बाटवून, नासवून टाकण्याचे मोठे कारस्थान पुणे, नागपूर, जालना अशा ठिकाणांहून चालू आहे. तिथे वापरा शक्ती. नुसते शिवरायांच्या नावाचे तुणतुणे वाजवून काहीच व्हायचे नाही.