"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Friday, October 22, 2010

ठसे

मी लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जायला लागलो. सुरुवातीला खूप कंटाळा करत असे..पण हळूहळू संध्याकाळ झाली की राहावेनासे व्हायला लागले..पावले शाखेकडे वळत असत.
आज अत्यंत अभिमानाची गोष्ट म्हणजे मी एक ‘स्वयंसेवक’ आहे. ही अनुभूती आहे.

आज कितीक उन्हाळे, पावसाळे आणि हिवाळे शाखेच्या संघस्थानावर घालवले. अनेक वर्ग, बैठका, संघ शिक्षा वर्ग, शिबिरे यात सहभागी झालो..माझ्या कार्यक्षेत्रातील कित्येक घरांमध्ये त्या कुटुंबाचा सदस्यच झालो.

ज्याप्रमाणे वाळूत किंवा मातीत त्यावरून चालणाऱ्या असंख्य लोकांचे ठसे उमटत राहतात..काही पुसले जातात, काही खोलवर राहतात...तसेच आजवरच्या संघकार्यात स्मृतीपटलावर कोरले गेलेले काही ‘ठसे’!





१. मी लहान असताना मला शाखेत न्यायला एक शिक्षक येत असत. मी बिल्डींगमध्ये सायकलवरून फेऱ्या मारत असताना ते ठरलेल्या वेळी न चुकता, न कंटाळता येऊन मला घेऊन जात असत. खेळ उत्तम खेळत असत. पुढे ते CA झाले. मध्यंतरीच्या कालावधीत काही क्षुल्लक कारणांनी ते कामातून बाजूला झाले. मी जबाबदारी घेऊन कामाला लागेपर्यंत ते पूर्णतः बाजूला झाले होते. मला वाटत असे कामामुळे, वेळेअभावी येणे होत नसेल. पण मग लक्षात आलं की काहीतरी बिनसलं आहे.
पण मी संपर्क सुरु ठेवला. आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. आता त्यांच्या मुलाला शाखेत घेऊन जाण्यासाठी ते मला सांगत होते! एव्हाना ते मूळ कारणसुद्धा विसरले. गणपतीला मी गेलो होतो तेव्हा निवांत गप्पा झाल्या. माझ्याबरोबर काही तरुण स्वयंसेवक होते. जुन्या आठवणी सांगून त्यांना उद्देशून ते म्हणाले, “मी ह्यांना सोडलं ....तरी ह्यांनी मला सोडलं नाही”! चष्म्यातून चमकणाऱ्या डोळ्यातली भावुकता ‘ठसा’ उमटवून गेली!


२. लहानपणी मी एका दिवाळी वर्गाला गेलो होतो. हनुमान टेकडी नावाच्या एका ठिकाणी हा वर्ग होता. रात्री थंड हवा होती. झोपण्याची वेळ झाली. आमच्या शाखेतील आम्ही बरेचजण असल्याने लगेच झोपू हे अशक्यच होतं. पडून गप्पा मारत होतो. काहीजण झोपून गेले. मंद वारा वाहात होता. टेकडी असल्याने अंधार बऱ्यापैकी होता. दूरवर कुठेतरी दिव्याचा प्रकाश जाणवत होता. मला अनोळखी ठिकाणी झोप येतच नसे. अजूनही नाही येत. तर शेवटी मी एकटाच जागा राहिलो डोळे मिटून. साधारण १-१.३० च्या सुमारास मला कोणीतरी येत असल्याची चाहूल लागली. एक वृद्ध स्वयंसेवक आले...आणि ज्यांच्या अंगावरची चादर बाजूला गेली आहे त्यांच्यावर नीट पांघरून गेले. त्या थंडीमध्ये आपले स्वयंसेवक नकळत कुडकुडू नयेत म्हणून ही काळजी! मग पुन्हा दोनेक तासांनी.. ह्यावेळी मला चाहूल लागल्यावर मी मुद्दाम अर्धवट चादर बाजूला करून ठेवली. ते आले..आणि अंगावर व्यवस्थित चादर घालून गेले. एवढं छान वाटलं.. मग पहाटेपर्यंत अजून एकदा फेरी झाली. मी पुन्हा एकदा तो ऊबदार अनुभव घेतला. लहानच होतो..आमच्या शाखेतून गेलेल्या सर्व स्वयंसेवकात सर्वात लहान! तेव्हा कळलं नव्हतं की हा पक्का ‘ठसा’ अशी कायमची साथ करेल म्हणून...


क्रमशः   
पुढे वाचण्यासाठी -  http://vikramwalawalkar.blogspot.com/2010/11/httpvikramwalawalkar.html

Thursday, October 14, 2010

EVEN THIS WILL PASS AWAY...

मला आवडलेली एक सुंदर कविता.
EVEN THIS WILL PASS AWAY
Once in Persia reigned a king,
Who upon a signet ring
Carved a maxim strange and wise,
When held before his eyes,
Gave him counsel at a glance,
Fit for every change and chance:
Solemn words, and these were they:
'EVEN THIS WILL PASS AWAY."
Trains, of camel through the sand
Brought him gems from Samarcand;
Fleets of galleys over the seas
Brought him pearls to rival these,
But he counted little gain,
Treasures of the mine or main;
'What is wealth?' the king would say
"EVEN THIS WILL PASS AWAY."
'Mid the pleasures of his court
At the zenith of their sport,
When the palms of all his guests
Burned with clapping at his jests,
Seated midst the figs and wine,
Said the king: 'Ah, friends of mine,'
Pleasure comes but not to stay,
"EVEN THIS WILL PASS AWAY."
Woman, fairest ever seen
Was the bride he crowned as queen,
Pillowed on the marriage-bed
Whispering to his soul, he said
"Though no monarch ever pressed
Fairer bosom to his breast,
Mortal flesh is only clay!
'EVEN THIS WILL PASS AWAY."
Fighting on the furious field,
Once a javelin pierced his shield,
Soldiers with a loud lament
Bore him bleeding to his tortured side,
'Pain is hard to bear," he cried,
But with patience, day by day,
"EVEN THIS WILL PASS AWAY.'
Towering in a public square
Forty cubits in the air,
And the king disguised, unknown,
Gazed upon his sculptured name,
And he pondered, "What is fame?'
Fame is but a slow decay!
"EVEN THIS WILL PASS AWAY."
Struck with palsy, sore and old,
Waiting at the gates of gold,
Said he with his dying breath
'Life is done, but what is Death?"
Then as answer to the king
Fell a sunbeam on his ring;
Showing by a heavenly ray,
"EVEN THIS WILL PASS AWAY."


--Theodore Tilten

Sunday, October 3, 2010

प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः




प्रस्तुत लेखात एकल विद्यालयया एका विलक्षण प्रयोगाची यशस्वी कथा सांगण्याचा प्रयत्न केलेला असल्याने थोडेसे इतिहासात जाऊन शिक्षणाची परिस्थिती काय होती हे पहावे लागणार आहे. आजच्यासारखीच शिक्षणाच्या ......असं म्हणायला प्रवृत्त करणारी परिस्थिती होती का?


या विषयाचा उहापोह वेगळ्या लेखात केला आहे. प्रस्तुत लेखाचा उद्देश केवळ एक चांगले, समाजोपयोगी काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्या कामाला सहाय्यभूत ठरणारे आधारस्तंभ वाढवणे हा आहे. भारत हा खेड्यांचा देश आहे. आणि जेव्हा खेडी स्वयंपूर्ण होतील तेव्हा भारत संपन्न होईल. शहरांचा विस्तार हा देशाच्या विकासाचा मापदंड नाही म्हणता येणार. ग्रामाधारित विकासपथच अनुसरावा लागेल. भारतात कित्येक ठिकाणी हा प्रयोग यशस्वीरित्या चालू आहे. मध्य प्रदेशातील चित्रकूट-गोंडा हे तर त्याचे उत्तम उदाहरण. आणि हा विकास म्हणजेसुद्धा केवळ भौतिक संसाधने आणि रोजगाराच्या संधी नव्हेत. तर शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन, संस्कार या बाबींचा अंतर्भाव असलेला विकासपथ.

ग्रामीण शिक्षणाची परिस्थिती आपल्याला चांगलीच माहिती आहे. आंदण दिलेल्या अंगणवाड्या कोण बागडण्यासाठी वापरतात ते वेळोवेळी छापून येतच असतं. एकवेळ बिरबलाची खिचडी होईल तयार...पण दुपारच्या पुरवलेल्या जेवणाची काय 'खिचडी' होते ते वेगळं सांगायची गरज नाही. जिथे अन्य सोयी-सुविधा आहेत अशा गावांचे ठीक आहे. परंतु जिथे एस.टी. सुद्धा पोहोचली नाही, अशा ठिकाणी कोण जाणार..

पण समाजाला प्रबळ करण्याचे कार्य म्हणजेच ईश्वरी कार्य असे समजून काम करणाऱ्यांची संख्या कमी नाही. अशाच काही व्यक्तींनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन १९८६ साली डॉ. राकेश पोपली या अमेरिकेहून भारतात परतलेल्या अणुशास्त्रज्ञाने आणि त्यांच्या पत्नी रमा पोपली (बालशिक्षण तज्ञ) यांनी एक शिक्षकी शाळेची सुरुवात केली. झारखंड मधील रांची पासून १२५ किमी वर असणाऱ्या गुमला या ठिकाणच्या वनवासी बांधवांच्या क्षेत्रात ही मुहूर्तमेढ रोवली गेली. हळूहळू हा अमृतवेल वाढत गेला. २ वर्षांनी मदनलाल अगरवालांनी धनबाद जवळ ६० गावात अशा शाळा सुरु केल्या. मग हे वर्धिष्णू कार्य १९९५-९६ साली १२०० शाळांपर्यंत जाऊन पोहोचले.

२०००-०१ साली या सर्व चळवळीला अधिकृत रूप आले ते 'एकल विद्यालय फौंडेशन' च्या स्थापनेने. या फौंडेशनच्या वतीने शिक्षकांना आधी प्रशिक्षण दिले जाते. मग असे प्रशिक्षित शिक्षक ह्या एक-शिक्षकी शाळा चालवण्यासाठी पाठवले जातात.  ते त्या गावात राहतात. आणि गावातील मुलांना एकत्र करून शिकवतात. एक सुंदर पहाट त्या गावात झालेली असते. ज्ञानकिरण त्या गावात प्रवेशलेले असतात. मग ह्याच विद्यार्थ्यातून कधी कधी पुढे असे शिक्षक मिळतात. 'एक दीप से जला दूसरा' अशी ही चळवळ वाढते आहे. या चळवळीतून कित्येक प्रश्न सुटत आहेत. केवळ शिक्षणाचा प्रसार, साक्षरता याही पलीकडे जाऊन, आरोग्य, स्वावलंबन याचा अंतर्भाव होतो आहे. म्हणजेच पर्यायाने नक्षली वळवळीत जे कदाचित ओढले जाऊ शकले असते, ते आज सन्मानाचे आणि देशहिताला सहाय्यभूत असे जीवन जगात आहेत. काही ठिकाणी नक्षली दहशतवादी ह्या चळवळीमुळे परिवर्तित झाल्याचे दिसून आले आहे. काश्मीरसारख्या ठिकाणीसुद्धा 'एकल विद्यालय' घट्ट पाय रोवून  काम करते आहे. राष्ट्रीय एकात्मतेचा भाव परिपुष्ट होतो आहे.  


 एकल विद्यालयाच्या माध्यमातून भारताची अखंडता टिकवण्याचा प्रयत्न.- जम्मू आणि काश्मीर.


आजमितीला ३४,३४३ शाळा एकल विद्यालय चालवीत आहे. ह्या शाळांमधून शिक्षण घेत असलेली विद्यार्थी संख्या १०,३०,२९० आहे. हा सर्व अवाढव्य कारभार चालवायला निष्ठावान कार्यकर्ते लागत असतात. राष्ट्रीय विचाराने भारलेले आणि स्वयंप्रेरणेने कामात उतरणारे कार्यकर्ते आज ईश्वरी कृपेमुळे मिळत आहेत. सर्वांच्या मनात 'हे ईश्वरी कार्य' आहे आणि 'त्यासाठी आपण कटिबद्ध झालो आहोत' हा भाव आहे. कारण सर्वांचे लक्ष्य शेवटी 'परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं' हेच तर आहे.

नेहेमी वाईट गोष्टी आपल्यासमोर आणून, आपल्याला त्या बघायला लावून एक निराशाजनक चित्र आजची प्रसारमाध्यमे उभी करत असतात. अशा चांगल्या कामांची दखल क्वचितच घेतली जाते. तेव्हा आपण ह्या कामाची वाच्यता अधिक लोकांपर्यंत तर करूच पण या कामाला आपला अमूल्य वेळ, निधी, संसाधने देऊन ही चळवळ वाढती ठेवू. 

अंधाराचे भय बाळगण्यापेक्षा तेवणारी पणती न विझण्याची काळजी घेऊ आणि अजून पणत्या लावण्याचा प्रयत्न करू!





चिरविजयाच्या संकल्पाने हृदये काठोकाठ भरू | मातृभूमीच्या दिग्विजयाची सुप्त मनीषा पूर्ण करू ||


संदर्भ:- www.ekal.org, http://www.causes.com/causes/2781http://www.youtube.com/watch?v=QFlaCRXoMJAhttp://www.youtube.com/watch?v=CzMSBhLPO2Q&feature=related