"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Thursday, October 1, 2009

थंडोबा!

या मालिकेतील हा शेवटचा लेख. बंडोबा आणि गुंडोबा धुमाकूळ घालत असतानाच याला उत्तर देतील म्हणून प्रकर्षाने जे आठवतात ते म्हणजे 'थंडोबा'! लोकशाहीतील सर्वात महत्वाचा घटक- लोक, सामान्य जनता! शांतपणे आपला जीवनक्रम चालवणारे बहुसंख्य हे आज राजकारणापासून चार हात लांबच राहतात. निवडणुकीला मत द्यायलाही जर आपल्याला जमत नसेल तर नेत्यांवर तोंडसुख घेण्यात काहीच मतलब नाही.

हे लोक आज स्वस्थ बसून आहेत. उमेदवारांचे कर्तृत्व, त्यांचा धिंगाणा आणि त्यांची कोट्यवधींची संपत्ती पाहून मनोमन निराश, उद्विग्न होत आहेत. स.पा. च्या अबूंची अचंबित करणारी संपत्ती आहे तब्बल एक अब्ज! अशांना धडा कोण शिकवणार? आपल्या हातात बाकी काही नसले तरी 'आपटीबार' नक्कीच आहे. लहान मुलंच केवळ आपटीबार ला घाबरतात असं नाही..हे नेतेही खूप घाबरतात. पण थंडोबाच जर निराशेची चादर ओढून सुखेनैव झोपून राहणार असेल तर कुत्रं पीठ खाणारच! तेव्हा जागे व्हा. 'आपटीबार' आहेच हातात...फक्त वापर करा.

आता त्याचा वापर कुठे व कधी करायचा हे कळायला फार नाही, आपल्याच मतदारसंघातील उमेदवारांचा थोडा अभ्यास करायचा. वर्तमानपत्रांतून मतदारसंघनिहाय विश्लेषणे येतच असतात. त्यात आपले उमेदवार आणि त्यांची माहिती पाहून ठेवा.

बंडोबा आणि गुंडोबांच्या तावडीतून वाचायचे असेल तर थंडोबाला जागे व्हावेच लागेल. तेव्हा थंडोबा उठ आणि लोकशाही बळकट करण्यासाठी निराशेची चादर झटकून टाक. बघ आता तू झोपून राहिलास तर पुढे उठायाला फारच उशीर होईल. आत्ताच उन्हं चढायला लागलीयेत...

2 comments:

  1. I agree with you......
    mi jeva 8 vit hote teva amhi ek pathnaty basaval hot- 'Nivadnukivar' ani 9vit asatana 'Loksankhevar'.... Teva amhi pratek gava-gavat jaun lokansamor sadar karycho... we got support from Mharashtra Government for that... I really feel people should wake up.. we gave same message through that street play...

    ReplyDelete
  2. tujha ha blog khup mast ahe tujhe vichar ani jya prakare mandle ahe te khup chan ahe pan hey gandhi varti je lihile ahe te mala itkasa patat nahi arthat hey majhe vaiyaktik mat ahe pan ekandar ha blog chan ahe

    ReplyDelete