"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Sunday, July 15, 2012

संत तुकाराम

संत तुकाराम हा विषय खरा लेखाचा नाहीच. तो अनुभूतीचा विषय आहे. पण नुकताच नवा ‘संत तुकाराम’ चित्रपट पाहणे झाले आणि त्या विषयावर विचारप्रकटन करावेसे वाटले.
अणुरणीया थोकडा...तुका आकाशाएवढा..


‘श्वास’ पासून बरेच दर्जेदार चित्रपट येऊ लागले. कारणे काहीही असोत – शासनाकडून मिळणारी ‘टॅक्स फ्री’ ची सूट असेल किंवा अनुदानाचे आमिष असेल, अथवा चित्रपटगृहांना मराठी सिनेमे लावण्याची सक्ती असेल परंतु मराठी चित्रपट भरपूर येऊ लागले. अगदी टुकार चित्रपटही पासरीला पन्नास आहेत. विनोदाच्या नावाखाली बाष्कळपणा करणारे अभिनेते, अंगप्रदर्शन करणाऱ्या नट्यांचे नृत्याविष्कार (?) आणि अमराठी निर्मात्यांची गुंतवणूक यांचा समावेश असलेले सिनेमे उदंड जाहले. कोणी एक अभिनेता-निर्माता मराठी अस्मिता जागवणारे सिनेमे काढत सुटलाय.शिवरायांच्या हुकमी नाण्याला बाजारात विकायचे. असो. तरीही हे मान्य करावेच लागेल की मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत.
काल्पनिक कथानाकांपेक्षा वास्तवात घडून गेलेल्या व्यक्तिरेखांच्यावरील दर्जेदार चित्रपट आले आहेत. उदा. बालगंधर्व, हरिश्चंद्राची फॅक्टरी, अजिंठा, वासुदेव बळवंत फडके आणि याच यादीतला अगदी अलीकडचा ‘संत तुकाराम’.
संत तुकारामांच्या जीवनचरित्रातील अनेक ज्ञात-अज्ञात पैलू चित्रपटात येऊन गेले आहेत. तुकारामांच्या बालपणापासून सुरुवात झालेला हा सिनेमा प्रेक्षकाला मध्यंतरापर्यंत चांगलेच खिळवून ठेवतो. आणि मध्यांतरानंतरही ही पकड ढिली होत नाही. कर्णमधुर संगीताने सजलेली गाणी आणि सुंदर छायाचित्रण यांचा मनोहारी मिलाफ आहे. बोलबच्चन च्या या बाष्कळ युगात हा चित्रपट काढल्याबद्दल लेखक – दिग्दर्शक – निर्माते यांना मला मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात.    
 
लहानपणीचे तुकाराम, त्यांचे सवंगड्यांबरोबरचे खेळ, मस्ती, नदीत डुंबणं वडिलांना प्रश्न विचारणं हे बालपण दाखवून त्यानंतर हळूहळू कारुण्यपातळी वाढवत नेली आहे. कधीकधी तर डोळ्यात पाणी येतं, अंगावर शहारे उठतात. दुष्काळाचे भीषण चित्रणही यात आले आहे. गुरे, माणसे पटापट मरतात..शुष्क माळराने, सुक्या विहिरी, सांगाडे आणि तुकोबांच्या घरातील मृत्यू असे हृदयद्रावक प्रसंगही आले आहेत. दुष्काळात तुकोबा आपल्या घरातील साठवलेले धान्य लोकांना मुक्तहस्ते वाटून टाकतात. लोकांची झुंबड उडते आणि शेवटी तर लोक हमरीतुमरीवर आल्यासारखे भांडतात. तुटून पडतात धान्यावर. तुकोबांना हा एक धक्का असतो..की लोकांना आपले भलेही कळत नाही. असाच एक दाहक अनुभव त्यांना येतो. घरात आईचा मृत्यू झाल्यावर ते तेराव्याचे गावजेवण घालतात. त्यात लाडू वाटतात. नंतर सर्व पंगत उठल्यावर एक स्त्री (तुकोबांच्या आईची मैत्रीण) निरोप घ्यायला आणि सांत्वन करायला म्हणून येते. तुकारामांच्या घरातले सर्वजण भावूक होतात. तुकोबा पाया पडायला म्हणून वाकतात, ती स्त्रीही पटकन खाली वाकते अन् त्या धांदलीत तिच्या ओच्यात घेतलेले लाडू पटापट खाली पडतात. ती ओशाळं हसते आणि म्हणते “घरात जरा ह्यांना...”. तुकोबा काही बोलत नाहीत. नंतर तुकारामांची पहिली पत्नी आजारी असते तर गावातले लोक मधेमधे येऊन चौकशी करतात. त्यामागचा खरा हेतू असतो तिचा मृत्यू झाला तर आपल्याला गावजेवण मिळेल आणि एकवेळचे तरी चांगले खायला मिळेल. तुकारामांच्या दुसऱ्या बायकोच्या लक्षात ही गोष्ट आल्यावर ती सर्वांना कठोर बोलून हाकलून लावते. किंबहुना म्हणूनच तुकोबा आपले समाजप्रबोधनाचे काम जोराने सुरु ठेवतात. 
शिवरायांची भेट हा एक हृद्य प्रसंग आहे. हिंदुत्व रक्षण करणाऱ्या शिवरायांना संतांचे मोलाचे सहकार्य लाभले. किंबहुना आपल्या हिंदूराष्ट्राची ही परंपराच आहे – की केवळ बळ असून चालत नाही तर मानवकल्याणासाठी बळाच्या बरोबरीनेच विवेकबुद्धीही असावी लागते. हिंदू समाज म्हणून नेहेमीच ‘शापादपि शरादपि’ या भूमिकेत राहिला आहे. शास्त्रांच्या रक्षणासाठी शस्त्रांची आवश्यकता असते. हिंदू देवदेवता शस्त्रसज्ज आणि सद्रक्षणासाठी नित्यसिद्ध आहेत. हेच काम राजे आणि संतांनी वेळोवेळी केले. राजांनी सज्जनांना बलशाली बनवण्याचे प्रयत्न केले तर संतांनी बलवंतांना सज्जन बनवण्याचे काम केले. आणि म्हणूनच शक्ती आणि भक्ती या दोहोंचीही समाजाला गरज असते. केवळ एकाने चालत नाही. शिवरायांच्या बाबतीत संत तुकाराम किंवा संत रामदास यांनी हेच काम केले. चित्रपटात त्यांच्या भेटीत तुकोबांनी हा स्पष्ट उल्लेख केला आहे. की तुम्ही हे शक्तिजागरणाचे काम करायचे आणि आम्ही त्यात युवकांना आणि जनतेला जोडण्याचे, सहाय्यभूत करण्याचे कार्य करायचे. उदाहरणादाखल एक प्रसंग दाखवला आहे. दोन लांडग्यांशी एकट्याने झुंज घेणाऱ्या एका शूर तरुणाला तुकोबा शिवरायांच्या सेनेत भरती होण्याचे सुचवतात आणि पुढे लढाईत तो मावळा कामी येऊन शिवराय स्वतः त्याची रक्षा घेऊन त्या वीराच्या वडिलांना भेटायला येतात. तिथेच तुकोबांची पहिली भेट होते आणि तुकोबा राजांना घेऊन त्या घरी जातात. त्या वीरपित्याचे सांत्वन करतात, आणि स्वराज्याच्या कामी आल्याचा गौरवदेखील करतात. 

तत्कालीन सामाजिक परिस्थितीचेही चित्रण यात आले आहे. विशेषतः जन्माधारित वर्णव्यवस्था कशाप्रकारे मूळ पकडून होती आणि भेदाभेदाचे जळजळीत वास्तव कसे सहन करावे लागत असेल याची आपण कल्पनाच केलेली बरी. आजही या परिस्थितीत विशेष फरक पडला असेल असे नाही. तुकोबांना स्वतःला अनेक ठिकाणी ‘वाणी’ म्हणून उपरोधिक उल्लेखाला सामोरे जावे लागलेले आहे. गीतेवर, वेदावर बोलतो म्हणून अपमान सहन करावा लागलेला आहे. मंबाजी आणि अन्य स्वयंघोषित ब्राह्मणांनी कशाप्रकारे तुकोबांसारख्या संतांना अपमानित केलं, समाजासमोर हिणवलं, आणि धर्मपीठासमोर उभं केलं याचं वास्तववादी चित्रण झालं आहे. धर्मपीठासमोर तुकोबांवर आरोप ठेवला जातो की त्यांना वेदावर बोलण्याचा अधिकार नाही, गीतेचे निरुपण करण्याचा अधिकार नाही कारण त्यांचा जन्म उच्च जातीत झालेला नाही. तुकोबाही आपली बाजू मांडतात. परंतु तत्कालीन कर्मठ आणि मूर्ख पंडित त्यांना दोषी ठरवून शिक्षा फर्मावतात. 
अशासारख्या तथाकथित ब्राह्मण लोकांनी हिंदू समाजाची आणि धर्माची अपरिमित हानी केली आहे.  तुकारामांना त्यांच्या कथित गुन्ह्याची शिक्षा हीच की त्यांनी आपल्या अभंगरचनांचे कागद स्वहस्ते इंद्रायणीत बुडवायचे. तुकोबा जातात काठावर आणि आपल्या रचनांना प्रवाह देतात. या भागाचेही चित्रण खूप छान झाले आहे. जनसमुदाय जमा होतो. तुकाराम अन्नत्याग करतात. लोक जमून राहतात आणि मग एकजण त्यांचा एक अभंग म्हणतो, दुसरा माणूस दुसरा अभंग म्हणतो..अशाप्रकारे हेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की स्मृतीरुपाने ते अभंग चिरजीवी झाले. पुन्हा ते पाण्यातून वर आले हे दाखवण्याचं खुबीने टाळलं आहे असं मला वाटतं.
तुकारामांचे महत्व आहे कारण स्वतः प्रपंचात राहून भगवद्भक्ती, ईश्वरस्मरण, नामसंकीर्तन याची आवश्यकता त्यांनी पटवून दिली.  नेहेमीच्या जीवनात, सांसारिक, प्रापंचिक समस्यांमध्ये मार्गदर्शक ठरतील अशा रचना केल्या. त्या केवळ उपदेशात्मक नाहीत तर व्यावहारिक जीवनाचा परिपाठ घालून देणाऱ्या मौलिक सूचना आहेत. मनुष्यस्वभावाची ओळख, पारख, व्यवहारचातुर्य असे अनेक पैलू त्यांच्या रचनांमधून आढळतात. विठ्ठलावरची अभंग – अखंड श्रद्धा आणि जनहिताचे ध्येय हाच त्यांच्या जीवनाचा पाया होता.

सिनेमाला खूप गर्दी होती. थिएटरवर तर बाहेर काही लोक जवळ येऊन बोलत होते, “घ्या तुकाराम घ्या ६० रुपये..बाल्कनी घ्या”! तुकाराम एवढे ‘डिमांड’ मधे आल्याचा आनंदच झाला! परिवारासकट लोक आले होते. जेव्हा एका बहिणाबाई नावाच्या तत्कालीन संत महिलेचा उल्लेख आला तेव्हा आमच्या मागच्या रांगेत बसलेला एक पालक आपल्या मुलीला सांगत होता की “तुला शाळेत ज्यांची ‘पोएम्’ आहे ना, त्याच ह्या!” मला गंमत वाटली पण खूप बरं वाटलं की, लोक आवर्जून आपल्या मुलांना घेऊन आले होते. उत्तरोत्तर असेच मराठी चित्रपट निघावेत.

या चित्रपटातील गाणी तुम्ही ऐकू शकाल - http://www.dhingana.com/marathi/tukaram-songs-jitendra-joshi-radhika-apte-22607d1

Sunday, July 8, 2012

A bigger explosion?


Some interesting revelations may raise a curtain over great dramatic happenings. And this may be important in various ways as its connected to national security, religious harmony, social justice, political gameplan and human rights.



Bomb blast in Malegaon (Dist: Nashik, Maharashtra) took place in the year 2008. This happened near a masjid. Everybody thought that some extremist Hindu elements are responsible for it. Police and Anti Terrorism Squad (ATS), then headed by shri. Hemant Karkare, started their probe in this direction and arrested Sadhvi Pradnya Singh, Lt. Col. Shri. Prasad Shrikant Purohit and several others as ‘suspects’. From then onwards, all are languishing in jail. No charges have been confirmed. Sadhvi’s health is deteriorated to a great extent. She seems to have faced a great torture for interrogation or may I say, to get ‘desired’ answers from her. Meanwhile, Swami Aseemanand, who is also behind bars for the Samjhauta Express blast, told in Court that he was forced by NIA (National Intelligence Agency) to tell the Court that Hindu elements were involved in the design.

We have maintained since beginning that violence or explosions, bomb blasts on our own soil cannot be a way to protect dharma or rashtra. It undoubtedly destroys humanity in addition to other things like loss of wealth, faith and harmony. Such untoward incidents cannot be defended on grounds of religion or its protection. And we sincerely believe that whoever is found guilty after trying him/her (by fair trial!), should be punished as per the law of the land. They should not be spared on whatsoever ground. But at the same time we unequivocally believe that no innocent person should be made to suffer the miseries for indefinite period only on ground of suspicion. But the people mentioned above are languishing in jail for this reason.

Now some facts have surfaced which may change the direction of theories relating to Malegaon bomb blast.

Lt. Col. Purohit was serving in Military Intelligence. In 2005, Purohit in fact was invited to deliver a lecture on intelligence-gathering at the Mumbai headquarters of the Anti-Terror Squad. He claims to have informed his superiors about the inputs he received while working with Abhinav Bharat activists. His superiors knew what he was doing at the relevant time. This he has stated with proofs before the Court of Inquiry (CoI) in the ongoing trial. Mr Purohit told the Court of Inquiry: "I must make a mention here that out of the vast int (intelligence) network development by me with great efforts I came to know about the likely involvement of some right-wing leaders in anti-national activities. The inputs received on 12 October 2008 were immediately forwarded to then CO (Commanding Officer) SCLU (Southern Command Liaison Unit) Col Pancpore, OC A Team, Det SCLU, Maj P. Khanzode and to Maj. B. Dey of 1/6 team CCLU (Central Command Liaison Unit) on 12/13 October 2008 itself and a written report in this regard was fwd to Maj Dey on 15 Oct 2008. Was he on the official job then? 59 officials (witnesses) from the Army have confirmed this before the CoI. It might be the case that Purohit was given the ‘official’ job to get in touch with elements of extreme ideology opposing Islamic extremism, and then to communicate with them as their sympathizer. After this, to penetrate deep into the organization and know about their network of supporters/active participants as well as future plans and designs. This he did well.

Some reactions on his work : Col. Hasmuk Patel, then Commanding Officer of Southern Command Liaison Unit wrote in Purohit's ACR in 2007: The Officer has infiltrated the SIMI and other underground outfits in the region through his capabilities and go getter attitude.

Col. YK Singh in 2008, noted: "He (Purohit) provided valuable int on Tabliq-e-jamal and MFO (Muslim Fundamentalist activities which were appreciated by environment. He developed on effective informant network in AOR which led to acquisition of Naxal propoganda and terrorist activities."



Now second thing is, this ‘big game’ of the Military Intelligence can be to counter  the rise of Islamic terrorism in Bharat. To fan so-called aggressive Hindu elements by showing them sympathy and build an ad-hoc structure which will fight pseudo-war with IM/SIMI and alike. In this operation Purohit was to act as a catalytic agent. If this theory is true, is it not hazardous? Is it desirable? Can official agency of Govt do this? One has to search for these answers on his own. Opinion on this may differ from person to person.

Third and most dramatic thing possible in this episode is – though Lt. Col. Purohit was on official duty, and though he informed his superiors about his activities, he turned to be a ‘double agent’! This means while working with the Abhinav Bharat and other organizations’ people, he really developed sympathy for them. He subscribed to their ideology. He could not keep himself aloof from the activities of these organizations and contributed towards them. Here the bosses in MI remained in dark about the changed circumstances. They came to know it afterwards, when it was too late to pull Purohit back. He had left in that train.

These are all possibilities. Some possibilities may be the truth. Nobody knows the complete story. It is interesting how the Department of Purohit defends itself, what proofs he actually has to show that he was on the official duty, when did he go far ahead and sympathized with Abhinav Bharat from his heart, and if he still maintains that he sympathized/supported these people out of sheer compulsion of his duty, how this claim is countered by the Department. Once a person supports a thing, an ideology, a movement, how can any other person argue that whether it is really from that man’s heart or that he is pretending.

Therefore, in coming days, it will be very interesting to see the changed course of events and resultant upheavals in this tragic episode. 

Sunday, June 10, 2012

हिंदू नेतृत्वावर योजनाबद्ध आक्रमण?

भारतीय प्रसारमाध्यमांच्या बाबतीत अनेकदा संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. ‘पेड न्यूज’ असेल अथवा ‘स्टिंग ऑपरेशन’ ‘मीडियाचे काही खरे नाही’ असा सूर उमटत असतो. शिवाय मध्यंतरी एक इमेल मोठ्या प्रमाणावर फिरत होता, ज्यात न्यूज चॅनेल्सची मालकी खरी कोणाची आहे आणि त्यानुसार कोणत्या बातम्या किती प्रमाणात द्यायच्या हे ठरत असते असा विषय होता. आणि त्यामुळे आपल्याला चॅनेल्सवर दिसणारे चेहरे आणि बसवलेले विचारवंत हे ‘बोलके बाहुले’ आहेत. त्यांच्या हातात काहीच नसते (कागद सोडले तर!).

पण गेल्या काही वर्षांत सरकार कडून या विकाऊ प्रसारमाध्यमांच्या मदतीने एक षडयंत्र चालू असावे असा संशय येतो. समाजातील विकृती चव्हाट्यावर आणून समाजमनाला प्रबोधित करायलाच हवे. अंधश्रद्धा, घातक रुढी, भ्रष्टाचार याबाबत संप्रदाय, जाती असा भेदभाव न करता प्रसारमाध्यमांनी ते मांडायलाच हवे.

हिंदू धर्माचा कोणी एकच शीर्षस्थ नेता नाही. एक धर्मग्रंथ नाही. एकच पूजापाठ नाही. देव तर किमान तेहतीस कोटी! आणि ही अशी विविधता, मतांचे वेगळेपण हे तर हिंदुत्वाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. तेव्हा हिंदू समाजाला एकत्र करणे महाकर्मकठीण! पण तरीही असे प्रयत्न वेळोवेळी या भरतभूमीत होत राहिले आणि हिंदू, हिंदू म्हणून टिकून राहिले. या हिंदूराष्ट्राची ओळख पुसण्याचे किती प्रयत्न झाले..पण ज्याप्रमाणे ओहोटीनंतर सागराचे बलिष्ठ गर्जन पुन्हा उचंबळून येऊन किनारा भरून टाकते, त्याप्रमाणे हिंदू समाज असंख्य पीडा, अत्याचार यांना तोंड देऊन झळाळून उठला आहे.
वर्तमान समाजात काही प्रवचनकार, महाराज, बाबा, स्वामी, बापू, अम्मा, आई, देवी असे दिसतात ज्यांच्या मागे हिंदू समाजाचा फार मोठा वर्ग आहे. प्रत्येकामागे स्वतःचे असे जनसंग्रह आहेत. या सर्वांनाच वाईट म्हणण्याची आवश्यकता नाही. आणि त्यात जे वाईट आहेत त्यांना उघड केलेच पाहिजे. पण हे करत असताना केवळ हिंदू धर्म आणि हिंदू समाज यालाच लक्ष्य करण्याची आवश्यकता नाही.

आसाराम बापू – यांच्या मागे गुजरात, महाराष्ट्र या राज्यातील खूप मोठा जनसमुदाय आहे. रंगपंचमीला तर अहमदाबादच्या आश्रमात आलेले उधाण पाहण्यासारखे असते. स्वतः बापू हातात एक भलामोठा पाईप घेऊन जमलेल्या असंख्य लोकांवर पाणी उडवत असतात. ‘ऋषिप्रसाद’ या नावाने यांचे मासिक निघते. बऱ्यापैकी वाचनीय असते. ऋतूमानानुसार पौष्टिक, चविष्ट ठरतील अशा पाककृती दिलेल्या असतात. मुलांसाठी कथा, श्लोक असतात.
यांच्यावर/आश्रमावर आरोप झाले की त्यांच्या पूर्वाश्रमीच्या सहकाऱ्याला त्यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अजून पुढे काही झाले नाही. आरोप खरे-खोटे, कोणाला काही ठाऊक नाही. मात्र प्रतिमा मलिन झाली हे नक्की.

रामदेव बाबा  
यांच्याबद्दल सध्या भारतीय जनतेला फारच माहिती झालेली आहे. योग प्रचाराचे कार्य नेटाने केले अनेक वर्ष करून ‘पतंजली योग विद्यापीठ’ ची स्थापना केली. त्याद्वारे आयुर्वेद, वनौषधी यांना पुन्हा एकदा जनमानसात रुजवण्याचे काम केले. शेकडो ठिकाणी औषधी उत्पादने विकणारे दुकाने काढली जिथे मोफत वैद्यकीय सल्ला दिला जातो. ‘आस्था’ वाहिनीवरून दररोज सकाळी प्राणायामाचे प्रसारण. देशभर प्रवास करून हजारोंच्या संख्येची शिबिरे घेतात, ज्याला लोक भल्या पहाटे घरून सतरंज्या आणून हजेरी लावतात. आणि केवळ योग-प्राणायाम नव्हे तर त्याबरोबर राष्ट्रवादी विचारांचे प्रकटीकरण करतात. प्राणायामाचा एवढा प्रसार केला की लोक ट्रेनमधून प्रवास करताना बसून, बागेत बसून, मैदानात बसून, कट्ट्यावर बसून, डोळे मिटून पोटं हलवताना दिसतात. सामान्य स्तरावर प्राणायामाचा एवढा प्रचार होईल असे भाकितसुद्धा कुणी करू शकले नसते. हल्ली ते भ्रष्टाचारावर आणि काळ्या पैशावर घसरले आहेत. विदेशी बँकात जमा असणारे काळे धन परत आणावे म्हणून त्यांची लढाई चालू आहे. दिल्लीतल्या त्यांच्या शांततापूर्ण आंदोलनावर सरकारने मध्यरात्री केलेली कारवाई कुविख्यात आहे. म्हातारे-कोतारे, महिला न बघता सरळ त्या निद्रिस्त जमावावर लाठीहल्ला चढवणाऱ्या पोलिसांना कोणाचे तसे आदेश होते हे लपून राहिलेले नाही. हा षडयंत्राचा भाग नव्हे तर काय?

कम्युनिस्ट पार्टीच्या वृंदा करात यांनी रामदेव बाबांच्या आयुर्वेदिक औषधे बनवणाऱ्या कारखान्यातील कामगारांना हाताशी धरून संप घडवून आणला. बाहेर बातम्या आणवल्या की आयुर्वेदिक औषधात प्राणांच्या हाडाची पूड असते म्हणे. पुढे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (forensic lab) ते आरोप निराधार असल्याचे सिद्ध झाले. पण नाव खराब झालेच. विक्रीवर/उत्पादनावर परिणाम झालाच. आणि त्यावेळी करात प्रभृतींची ‘कम्युनिस्ट पार्टी’ ही काँग्रेसप्रणित आघाडी सरकारचा एक महत्वाचा साथीदार होती. त्यामुळे रामदेव बाबांवर आरोप करणे हा षडयंत्राचा भाग नव्हे तर काय?

नरेंद्र महाराज – नरेंद्र महाराज महाराष्ट्रातील नाणीज येथे मूळ आश्रम असलेले एक पंथनेते. ह्यांना मानणारा खूप मोठा वर्ग आज महाराष्ट्रात आहे. नरेंद्र महाराजांच्या कृपाप्रसादाने कामे होतात, आजार बरे होतात, प्रापंचिक सुख लाभते असे मानणारा मोठा भक्तगण आहे. प्रचंड गर्दी यांच्या सभांना होते. बरं ‘दारू सोडा, त्याचे वाईट परिणाम होतात’, ‘हिंदुत्वावर, आपल्या देवांवर श्रद्धा ठेवा’, ‘गायींचे रक्षण करा’, ‘धर्मांतरणाने काय दूरगामी परिणाम होणार आहेत’, ‘धर्मांतरणाचे षडयंत्र/कावा काय आहे’ हा आणि अशा प्रकारचा उपदेश ते जनसभांतून करत असतात. हे आवश्यकच कार्य आहे. ह. मो. मराठे लिखित ‘एक माणूस एक दिवस’ या पुस्तक मालिकेत एक प्रकरण नरेंद्र महाराजांवर आहे. त्यातून महाराजांची कार्यपद्धती स्पष्ट होते. ते वाचकांनी वाचणे सयुक्तिक राहील पण त्यांच्या कामाचा एक मुख्य पैलू, जो त्या ‘दिवसाच्या’ कार्यभागात ठळकपणे आलेला नाही तो म्हणजे त्यांचे परावर्तनाचे काम. परावर्तन म्हणजे जे हिंदू अन्य संप्रदायात गेले आहेत उदा. मुस्लिम अथवा ख्रिश्चन झाले आहेत त्यांना पुन्हा हिंदू करून घेणे. शिवरायांनी नेताजी पालकरच्या बाबतीत केले तसे. कारण एखादी व्यक्ती/कुटुंब जेव्हा अहिंदू होते तेव्हा त्याचे त्या कुटुंबावर, समाजावर, देशावर होणारे परिणाम गांधीजींनी आपल्या लिखाणातून स्पष्ट केले आहेत. तेव्हा हे निकडीचे काम नरेंद्र महाराज करीत असतात. आजवर हजारो हिंदूंचे अशा प्रकारे हिंदू धर्मात पुनरागमन झाले आहे. हे काम करायलाही हिंमत लागते. असे काम करणाऱ्या मसुराश्रमाच्या स्वामी श्रद्धानंदांचा एका मुस्लिम माथेफिरू युवकाने चाकू भोसकून खून केला होता हे विसरता येत नाही.

शिवाय महाराज जमलेल्या निधीतून अपंगांना चल-खुर्च्यांचे (wheel chairs) वाटप, महिलांना शिवणयंत्रे, गावांना अॅम्ब्युलन्स चे लोकार्पण अशी कामे संस्थान तर्फे करत असतात. त्यांच्या ‘धर्मक्षेत्र’ या मासिकातून त्याची सचित्र माहिती दरवेळी येत असते. शिवाय श्रीरामसेतू वाचवण्याच्या आंदोलनात ते खूप सक्रिय राहिलेले आहेत. नुकताच पुन्हा त्या विषयावर त्यांनी आपल्या मासिकात लेख लिहिला आहे. अशा कामांमुळे हिंदुद्वेष्ट्या काँग्रेस ची त्यांच्यावर वक्रदृष्टी वळती ना तरच नवल!
आता याला विरोध कसा करायचा? मग अंधश्रद्धेचं लचांड मागे लावून दिलं. अं.नि.स. तयार आहेच. सरकारी तालावर नाचून काम करणाऱ्या गैर-सरकारी संस्थांची आपल्या राज्यात-देशात काही कमी नाही. चांगल्या कामाबाबत शाबासकी देऊन मग त्यातील अनिष्ट प्रथा संपविण्याबाबत बोलणार असाल तर तुमचा हेतू शुद्ध असल्याचे स्पष्ट होईल, अथवा तुमच्यावरचे प्रश्नचिन्ह कायम राहील. नरेंद्र महाराजांना शंकराचार्य म्हणणे आम्हाला स्वतःला व्यक्तिशः पटत नाही. पण कोणी कोणाला काय म्हणावे आणि कोणात काय पहावे हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा आणि वैय्यक्तिक मतांचा प्रश्न आहे, ज्याचा आम्हाला पूर्ण आदर आहे.

तेव्हा नरेंद्र महाराजांचे काम हे वाखाणण्यासारखे आहे एवढे निश्चित. त्याला विरोध करणे आणि सांप्रदायिक म्हणणे हा षडयंत्राचा भाग नव्हे तर काय?

अनिरुद्ध बापू – महाराष्ट्रात विशेषतः शहरी भागात बापूंचा मोठा भक्तगण आढळतो. टीका करणारेही अनेकजण आढळतात. बापूंच्या कार्यक्रमांना गर्दी तर असतेच पण त्यांच्या चांगल्या विधायक कामांनाही गर्दी असते.

बापू रामरक्षेचे पठण करायला सांगतात. आज हिंदू घरांमधून रामरक्षा हद्दपार होत असताना त्याचे पठण होणे ही आनंदाची बाब आहे. ज्या ‘विष्णुसहस्त्रनामातून’ आपल्या हिंदूंची नावे ठेवली जातात त्या विष्णुसहस्त्रनामातील एकेक नाम घेऊन त्यावर प्रवचन करतात मराठीत आणि मग साईसच्चरितावर हिंदी मध्ये प्रवचन करतात. खूप गर्दी असते. शिवाय त्यांचे २ भक्त मी जवळून पाहतो आहे. आपले काम व्यवस्थित करून फावल्या वेळात ते नामजप करत असतात. रिकाम्या वेळात सूत वळण्यासारख्या यंत्रावर काही करत असतात. हे विशेष आहे. 


बापूंच्या प्रेरणेतून ‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’ आणि ‘अनिरुद्धाज अॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट अशा दोन संस्था कार्यरत आहे. पुराच्या वेळेला, सार्वजनिक ठिकाणी गर्दीच्या वेळी, गणेशोत्सवात-दहीहंडीच्या वेळेला, अंगारकी दिवशी सिद्धिविनायकाला अशा गरजेच्या वेळी हे कार्यकर्ते दिसून येतात. हे चांगले काम नाही काय? एवढे लोक आपले घर सोडून प्रशिक्षण घेऊन जर गर्दीच्या वेळी उभे राहत असतील तर बापूंनी घातलेल्या सादेला माणुसकीने ओ दिली असेच म्हणावे लागेल. परंतु हे काम पुढेच येत नाही. पुढे येतात ते आरोप-प्रत्यारोप. 

सत्यसाईबाबा – आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी गाव. सत्यसाईबाबा. चमत्कार. भक्तगण. याहीपलीकडे  त्यांच्या प्रेरणेतून चालवण्यात येणारी कित्येक कामे आहेत जी खरेतर सरकारने करायला हवी होती, पण सरकार नाकाम ठरल्याने ह्यांनी उभारली आहेत. ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवस्था, रुग्णवाहिका, शाळा, कॉलेजेस, पेयजल सुविधा इ.
त्यांच्या चमत्कारांना विरोध असावा. पण त्यामुळे त्यांनी केलेले काम नजरेआड करता येत नाही. केवळ एक चमत्कारी बाबा म्हणून त्यांचे व्यक्तिचित्रण करणे अयोग्य आहे. प्रसारमाध्यमं सुद्धा चांगली बाजू सोडून जे नको तेच दाखवत बसतात. प्रसारमाध्यमांना चांगले दाखविण्यास कोणी बंदी केली आहे का? कोणी बंदी केली आहे? हा षडयंत्राचा भाग नव्हे तर काय?

श्री श्री रविशंकर – ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या नावाने आपले काम उभे करणाऱ्या श्री श्री रविशंकरांना आता सर्वजण ओळखतात. सौम्य, सोज्ज्वळ प्रतिमा असलेले हे ‘गुरुजी’, ‘आचार्य’ या नामाभिधानांनी आपल्या भक्त परिवारात प्रसिद्ध आहेत. भारतातल्या उच्चभ्रू समाजात हिंदुत्वाचे जागरण अवघड पण निकडीचे झाले होते, आजही आहे. उत्तम शिक्षण, त्यामुळे उत्तम नोकरी आणि त्यामुळे लट्ठ पगार, त्यामुळे क्लब-गाड्या-छंद असे काहीसे सुखासीन जीवन असणाऱ्या आणि पाश्चात्य जीवनशैलीचा प्रभाव व स्वीकार असलेल्या घरांमध्ये आज श्री श्री पोहोचले आहेत. त्या समाजात ‘गुरुजींची’ भक्ती केली जाते.

श्री श्रीं चे काम हेसुद्धा विविध पैलूंचे आहे. भगवद्भक्ती करण्यासाठी उत्तम संगीतयोजना वापरून भजनांची/स्तोत्रांची निर्मिती यांनी केलेली आहे. शास्त्रीय संगीताला उजाळा देण्यासाठी ‘ब्रह्मनाद’ नावाने काही कार्यक्रम देशभर झाले, ज्यात लोकांनी आपापल्या ठिकाणी ठराविक रागाचा ठराविक पद्धतीने अभ्यास केला-समान पद्धतीने सराव केला आणि ज्याचे शेवटी नियत दिवशी हजारो जणांनी एकत्रित वादन केले. आमच्या आवडत्या हंसध्वनी रागातील हे सादरीकरण –



कोणी म्हणेल की ह्या अशा ‘ब्रह्मनाद’ प्रकारच्या कार्यक्रमांनी काय होणार आहे? त्यापेक्षा स्वच्छता, वृक्षारोपण, मुलांना शिकवणे, आरोग्यसेवा ही समाजसेवा उपयुक्त ठरेल. पण ह्याची दुसरी बाजू अशी आहे की, एवढे लोक नियमित सरावासाठी जमत होते आपापल्या ठिकाणी, आणि मग एकत्रित वादनासाठी जमले. हा सर्व काल हे सर्वजण वाईट विचार, मत्सर, क्रोध, असत्यवचन, मदिरापान अशा आणि इतर अनिष्ट गोष्टींपासून दूर राहिले. हे चांगले कर्म नव्हे तर काय! आणि त्याचे कर्मफल मिळाल्याशिवाय राहील का? तेवढी पापाची/वाईटाची राशी कमी झाली. असेच त्यांचे नियमित ‘सत्संग’ चालतात. तरुण, कॉलेजविद्यार्थी यांच्यासाठी ‘YES plus’ नावाचा कार्यक्रम चालतो. ज्यात तरुणांना व्यक्तिमत्व विकास, आत्मविश्वास यासबंधाने प्रशिक्षण दिले जाते. 
योगासने आणि सूर्यनमस्कार यांवर भर दिलेला आहे. नुकतीच त्यांनी एक मोठी ‘इव्हेंट’ केली. http://yogathon.in/  त्याचे थीम साँग (साईटवर जाताच खाली वाजू लागते) हे ज्या वर्गात त्यांचे काम अभिप्रेत आहे त्याला अगदी साजेसे असे आणि अपीलिंग होते! स्वतः श्री श्री देशभर फिरून कार्यक्रम घेत असतात.
येणाऱ्या काळात श्री श्रीं वर आरोप होण्याची शक्यता आहे. त्यात त्यांची कसोटी तर लागणारच आहे, पण त्यांच्यावर विश्वास असणाऱ्या वर्गाची/भक्तगणाचीही त्यानिमित्ताने परीक्षाच जणू होणार आहे. येणारा काळच चित्र स्पष्ट करेल..

माता अमृतानंदमयी तथा अम्मा – तामिळनाडू मध्ये अम्मांचा भक्तगण आढळतो. मुंबईसारख्या शहरातही अम्मांचा कार्यक्रम अलोट गर्दीमध्ये पार पडतो. दाक्षिणात्य जनतेमध्ये अम्मांबद्दल खूप आदर आणि प्रेम आहे. त्यांनी सुद्धा शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठ स्थापन केले आहे. पण कितीजणांना ते ठाऊक असेल कल्पना नाही. पण यांच्याविरुद्धही एका ब्लॉगवर लेखन आढळले मध्यंतरी. अजून त्यामानाने तशी टीका नाही होत अम्मांवर.
असे अजून कित्येक आहेत पूज्य मोरारी बापू, श्री. रमेशभाई ओझा, स्वामी महामंडलेश्वर इ. वरील सर्वांवर आरोप होतात असं नाही. पण कित्येकांवर झाले आहेत आणि काहीजणांवर निकटच्या भविष्यात अपेक्षित आहेत. म्हणून वानगीदाखल काहीजणांचा उल्लेख या लेखात केला आहे.


अहिंदू समाजातील आवश्यक बदल – 
मुस्लिम – अंधश्रद्धा आणि वाईट चालीरीती हिंदू समाज सोडल्यास अन्य संप्रदायात नाहीत काय? ३ वेळा ‘तलाक’ उच्चारण करताच घटस्फोट मिळतो, आधुनिक विज्ञान-गणित यापासून वेगळे केवळ एकांगी असे मदरसा शिक्षण द्यायचे, आपल्या खाजगी तीर्थयात्रेसाठी सरकारकडून निधी घ्यायचा, येथील हिंदू समाजाला प्रिय असणाऱ्या गोवंशावर सुरा फिरवायचा, समान नागरी कायद्याला विरोध करायचा, वंदे मातरम म्हणायचे नाही या गोष्टी बदलायला नकोत का? (http://vikramwalawalkar.blogspot.in/2011/06/blog-post.html) नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने १० वर्षांत क्रमबद्ध रीतीने हज अनुदान संपुष्टात आण असे निकालपत्र दिले आहे. पण तरीही नवीन हज हाऊस चे बांधकाम, निधी वितरण जोरात सुरु आहे. शासन का गुढगे टेकते आहे? मुंबई ला एक हज हाऊस आहेच खूप वर्षांपासून. नुकतेच नागपूर ला एक बांधून झाले. आता संभाजीनगर (औरंगाबाद) ला नव्या हज हाऊस चे बांधकाम सुरु आहे. एरवी तुमच्याकडे निधी नाही शिक्षणासाठी, ग्रामविकासासाठी, एस.टी. साठी, सिंचनासाठी, विद्युतनिर्मितीसाठी. मग इथे का उडवता पैसा?

ख्रिश्चन – वनवासींना आमिषे दाखवून ख्रिश्चन बनवायचे, कॉन्व्हेंट शाळांमधून टिकली-बांगड्या यांसारख्या हिंदू चिन्हांवर बंदी घालायची, पूर्वांचलातल्या ख्रिस्ती समाजात अराष्ट्रीय विचारांचे रोपण करून त्याला चालना द्यायची, आजारी लोकांना येशू हाच तारणकर्ता असल्याचे भासवून भोंगळ उपचार/पाणी/ताईत यांच्या नावाखाली ख्रिश्चन बनवायचे, अपंग पाणी शिंपडताच चालू लागले, मुके बोलू लागले, बहिरे ऐकू लागले अशा जाहिराती करून ख्रिस्ती प्रसार करायचा या गोष्टी थांबायला नकोत का? http://christianaggression.org/

ही अंधश्रद्धा नाही का? त्याचे ‘निर्मूलन’ करावे असे कोणत्या समितीला वाटत नाही का? एरवी कोणी चर्चमध्ये जायला, बायबल वाचायला, त्याचे गुणगान गायला आमचा विरोध नाही. किंबहुना आम्हीच ‘सर्मन ऑन द माउंट’ श्रद्धेने वाचतो. त्यात आम्हाला आमचे हिंदुत्व आड येत नाही. परंतु तुम्ही जर धर्माची विक्री करत असाल तर आमचा विरोध हा राहणारच.

तेव्हा या अशा सर्व गोष्टींकडे काणाडोळा करून जर हिंदू धर्माच्या नेतृत्वाला लक्ष्य केले जात असेल तर तो षडयंत्राचा भाग नव्हे काय? आता स्वामी नित्यानंद आणि तत्सम लोकांना उघडे केल्याबद्दल धन्यवादच द्यायला हवेत. पण अन्य बाबतीत आम्हाला एका मोठ्या कारस्थानाचा भाग वाटतो आणि म्हणून तो लिखाणातून प्रकट करावा असं वाटलं..

Saturday, April 14, 2012

बिहार दिन : आईये मेहरबां, बैठिये जानेजां...

गुप्तहेर श्रीयुत बंडू यांनी मध्यंतरी एक फोनवरील संभाषण टॅप केले आहे. बंडू आमचे खासे असल्याने आम्हांस त्यांनी ते ऐकवले. आणि आपण सर्वच आमचे खासे असल्याने आपणांस ते ऐकवण्यावाचून आम्हांस राहवले नाही!
प्रस्तुत कॉल हा इये मुंबईचिये नगरीतून थेट बिहार प्रांती लावण्यात आला होता!
Smiling Old Man (SOM) and Angry Young Man (AYM)
दोन टोकांकडून बोलणाऱ्या माणसांची ओळख गुप्त ठेवण्यासाठी बंडू यांनी संकेतशब्द वापरले आहेत. फोन लावणारी व्यक्ती म्हणजे Angry Young Man (AYM) आणि दुसरी व्यक्ती Smiling Old Man (SOM). तेव्हा आपले डोके थोडे खाजवा आणि या व्यक्तींना ओळखा...
ट्रींSSSग ट्रींSSSग...... ट्रींSSSग ट्रींSSSग..... ट्रींSSSग (एस टी डी असल्याने दीर्घ लांब रिंगा बरं का!)
SOM : हल्लू... कौनो बोलत है ?
AYM : अरे हम वो मुंबैसे हा बोलतो है |
SOM : बोल बोल.. तोहे हमरी याद कैसन बा?
AYM : हमरीतुमरी पे आनेका वेळ हो गया ना!
SOM : का बिटवा, अबु क्या हुवा?
AYM : अबु को झब्बू दिया एक बार.. अब वो जूना हो गया ना.. पब्लिक को भी
कुछ नया मंगता!
SOM : अच्छा तब हमरी याद हुई गवा.. बोलो क्या करना है?
AYM : बिहार दिन मनाने को येवो मुंबई में..
SOM : अरे उ तो हो गया.. अब काहेका?
AYM : ना भैय्या ना.. हमरी मान तो इतवार के दिन आ जा.. हमरे पोरोंको सुट्टी रहता उस दिन!
SOM : ओ अब किसलिए?
AYM : अबे चाचा,.. (पुढे काही बोलणार इतक्यात पलीकडून)
SOM : चाचा मत बोल..चाचा मत बोल... तुम चाचा को क्या करता तुमरे मुल्क में, मैं अच्छा जानत हूं! डर लगता जी! लुच्चा बोल.. चलेगा..चाच्चा नै!
AYM : छोड़. दिल पे मत ले यार.. वो तो चलता रहता है..
SOM : बोल.
AYM : चुनाव हो गया.. अच्छा प्रदर्शन रहा मेरा..
SOM : तुभी प्रदर्शन लगाता है? तेरा भाई लगाता है न प्रदर्शन ?
AYM : वो नै रे.. चुनाव परिणाम अच्छा आया.. अभी कुछ करके पब्लिक को गरम रखना मंगता की नै? यू.पी. हो गया. अब बिहार. देखा ना कैसा समाजवादी को मुनाफा हुआ वहापे? मै भी उसका कारण. यहाँ मौका दिया की नै उनको, उनके लोगोंको सपोर्ट देने में! अब देखो तुमको भी होगा..
SOM : हं..शातीर दिमाग!
AYM : अरे क्या यार..बचपन से देखता जो आया हूँ!
SOM : ठीक. मै आता चल.. थोडा मार खाया तो ही कुछ मिलेगा यहाँ पे!
AYM : अरे तुझे कौन मारेगा..! हमरा पागल बच्चा लोग थोडा गुस्ताखी करेगा..तोडेगा फोड़ेगा..काला रंग थोडा यहाँ-वहाँ... फिर पोलिस उनको अंदर करेगा.. उनके घर जा के थोडा बसनेका! फिर देख!
SOM : और?
AYM : और क्या.. तीन-चार घंटे का होगा ये सब नाटक. फिर तू फ्री..और मै फ्री! वो अंदर किये हुवा रहेगा तीन-चार दिन अंदर.. फिर आयेगा बाहर.. केस चलेगा तीन-चार साल.. तब तक नया लड़का लोग मिलेगा ना भाय! ऐसेच हवा होता है अपना!
SOM : यार ये सीखना मंगता मेरे को.. मै तो विकास की बाते करता रहता हूँ|
AYM : मेरी मान तो ये अपना ले.. और फिर देख! विकास बिकास वो सब झूट है. वो किसको मंगता? पब्लिक को तमाशा, नौटंकी, पत्थर, पोलिस, ऐसा मसाला मंगता!
SOM : ठीक है| हम आवत है|
AYM : तोहरे स्वागत की तैय्यारी करता हूँ|
(फोन ठेऊन लगेच... “ए चला रे.. फटाके जमवा, दगड जमवा”. “पण साहेब, फटाके कशाला?” . “अरे गाढवा त्याशिवाय मी म्हणणार कसं (तर्जनीने चष्मा डोळ्यांवर सरकवत) “फटाके पुरे करा आता... मग अजून जरा वाजवायचे.. “बास रे आता”. कार्यकर्ता भावविभोर होऊन, “साहेब तुस्सी ग्रेट हो!”  
---------------------------------------------------------------------------
चहाच्या टपरीवर...
पंडितराव भैय्याजी चटपल्लीवार – काय सांगून राहिलं बे हे?
सोपानराव नानासाहेब वटवल्लीवार – तेच की रे, जुनंच तर सांगतंय. पोट्टे झाले उतावळे..कार्यक्रम नको द्यायला?
चटपल्लीवार – ह्ये बेनं बसतंय गाडीत  एशीत  अन् दितय लाऊन तंटा!
वटवल्लीवार – पोरायला बी तेच आवडतंय तर तू न् मी का त्रास करून राहिलो?
चटपल्लीवार – आरं गड्या, लुक्सान राज्याचं होतंय, देशाचं होतंय..
वटवल्लीवार – हितं कुणाला पडलीये बे? तू नगं परेशान होऊ.. होऊदे काय तो झांगडगुत्ता! ते आईस्क्रीम आलं बग की तुज्या हातावर इत्ळून..
चटपल्लीवार – व्हय की गड्या..ह्येच तर होतंय.. मायला ह्यांच्या.. हे झगडल्याचं दाखईतेत अन् आमचं काम बोंबलतंय ह्या आईस्क्रीमवाणी!
वटवल्लीवार – अक्करमाशे ह्ये.. काम ना धंदे! दंगा कराय्ले पोट्टे उदंड झाले! रिकाम्या डोक्यात ईष भरायचं अन् रिकाम्या हातात दगड द्यायचे! तपेक्षा रोजगार द्या म्हनावं रिकाम्या हाताइले.
चटपल्लीवार – चल उनात तापून राहिलो..सावली हुडकू..
वटवल्लीवार – चल बाबा. ह्येंच्या नादी लागनं म्हंजे आविष्याचा आपटीबार करन्यासारकं हाये बग!


ता.क. :- वरील वृत्त छापून होताच सकाळच्या चहा बरोबरचा ‘टाईम्स ऑफ इंडिया’ खालील बातमी घेऊन आला.. खरोखरच, बंडू तुम्ही फार चाणाक्ष आहात.. आपले स्पेशल ब्रांच मधले काम असेच सुरु ठेवा.  http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Raj-softens-calls-off-stir-against-Nitish-invite-on-Bihar-Divas/articleshow/12657788.cms







Saturday, April 7, 2012

हे सुरांनो ...


 हे सुरांनो...
जीवनाच्या अंतकाली हे सुरांनो साथ द्या,
चाललो मी दूर आता, एकदा मज हात द्या |
रंगलेल्या मैफिली अन् भंगलेल्या बैठकी,
जाहलेले सोहळे अन् छेडलेल्या बंदिशी |
श्रीफळे अन् शालजोड्या  रास त्यांची ती पहा,
मी जहालो मात्र साधन, त्या सुरांचा मान हा |
भारलेल्या त्या स्वरांनी मैफिली या गच्च भरती,
सूर ते विरता उरे जी मोजकी गर्दी अनोखी |
संपले ते सर्व आता आसनेही रिक्त झाली,
दाटला अंधार सारा आळवू द्या भैरवी |
गीत माझे ऐकणारे कोणी येथे आज नाही,
गीतसुद्धा शुष्क आहे, पूर्वीचा तो साज नाही |
सूर मजला स्पष्ट दिसतो पोहोचणे पण शक्य नाही,
कंप हा कंठास माझ्या भिवविते वार्धक्य राही |
तरीही पुन्हा एकदा मज पैलतीरी पार नेणे,
शिकविले ना केधवांही जीवनी या हार घेणे |
संपलेल्या या दिव्याला, आज पुन्हा वात द्या,
जीवनाच्या अंतकाली, हे सुरांनो साथ द्या |


                         ---विक्रम 






Sunday, April 1, 2012

पान, घोडा, भाकरी आणि सरकार.

भूदलप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी पंतप्रधानांना लिहिलेली गोपनीय चिट्ठी/पत्र फुटले आणि एका नव्याच गोष्टीला तोंड फुटले. आधीच जनरल अडचणीत आले होते ते जन्मदिनांकाच्या वादामुळे. आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांनी धक्कादायक विधाने केली आहेत आणि तीही देशाच्या सुरक्षेबाबत. एकूणात हा सर्व प्रकार दुःखदायक आहे. चिंताजनक सुद्धा आहे.
त्यांचे म्हणणे की भूदलाकडे असलेली शस्त्रात्रे कालबाह्य झाली आहेत. रणगाड्यांना लागणारा दारूगोळा नाही. हवाई सिद्धतेच्या ९७% कालबाह्य आहे. रात्रीच्या वेळी लागणारी (night vision devices etc.) उपकरणे नाहीत. आणि अशा अन्य अनेक भयावह गोष्टी.( http://articles.timesofindia.indiatimes.com/2012-03-28/india/31248793_1_army-chief-vk-singh-cbi-probe-bribe-offer)

सेनाध्यक्षांप्रती कितीही आदर आम्हाला असला तरी प्रस्तुत गोष्टीत ते चुकले असंच म्हणावं लागेल. एकतर तुम्हाला फार उशिरा जाग आली.. निवृत्तीला २-३ महिने राहिले असताना. बरं ती भ्रष्टाचाराची मागणी तुम्ही कार्यभार सांभाळल्यावर लगेच झाली होती.. तेव्हाच तुम्ही बोलायला हवे होते. शिवाय मधे जन्मदिनांकाचा वाद झाला, ज्यात तुम्ही सरकारला सर्वोच्च न्यायालयात खेचलेत. आता तुम्ही राग काढत आहात असं कोणी म्हणालं तर ते चूक ठरू नये. ती चिठ्ठी तुम्ही लीक केली नसेल पण ती तुम्हाला गुप्त ठेवता आली असती नक्कीच. आणि ती जर लीक झालीच असेल तर कशी ते तुम्ही पळभरात शोधून काढून त्याचा निकाल लावता आला असता. तेव्हा त्या लीक होण्यात तुमचा सहभाग नाहीच हे खरे वाटत नाही.

पण यामुळे सरकारला स्वच्छतेचे प्रशस्तीपत्रक मिळत नाही. जनरलनी केलेले आरोप जर खरे असतील तर फार गंभीर आणि देशाच्या जीवावर बेतणारे आहेत. आणि ते खरे असण्याच्या शक्यतेलाच जास्त  वाव आहे असे आम्हाला सेनादलातील भूतपूर्व आणि वर्तमान अधिकाऱ्यांशी बोलल्यावर जाणवले. शिवाय नॉर्दन कमांड चे जनरल कमांडिंग ऑफिसर (GOC) लेफ्टनंट जनरल के. टी. पारनाईक यांनीही या लाच देण्याच्या आरोपामध्ये तथ्य असल्याचे म्हटले आहे.( http://indiatoday.intoday.in/story/army-chief-general-v-k-singh-northern-command/1/182416.html). तेव्हा जनरलनी फार काही चूक केले असे वाटत नाही. देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्यांचा हा एक डावपेचाचा भाग असू शकतो की, प्रारंभीच कार्यभार सांभाळल्यावर बोलले असते किंवा बोलणार अशी कुणकुण जरी लागली असती तरी लगेच हकालपट्टी केली असती त्यांची. शिवाय अंतर्गत काही पावले उचलता येतात का याचीही त्यांनी चाचपणी आणि त्या दिशेने प्रयत्न केले असतील. पण जेव्हा त्यातला फोलपणा लक्षात यायला लागला तेव्हा त्यांनी ही आखणी केली असावी. त्यांना कळून चुकले असणार की ही सरकार नावाची ढिम्म म्हैस भ्रष्टाचाराच्या चिखलातून बाहेर यायला तयारच नाही! एवढे झाल्यावरच त्यांनी हंटर उगारला असावा. कारण आता २-३ महिनेच तर राहिलेत..केले बडतर्फ तर करुद्या. देशहितासाठी बडतर्फ झालो तरी चालेल, कारण नाहीतर निष्ठेशी तडजोड केल्यासारखे होईल.  

दुसऱ्या तर्काला पुष्टी मिळणारी अजून एक बाब असू शकते ती म्हणजे, ही १४ कोटींच्या लाचेची दखल त्यांनी घेतली असेल लगेच..त्याविरुद्ध त्यांनी सरकारदरबारी धावही घेतली असेल..पण उलटपक्षी त्यांनाच सुनावण्यात आले असेल की, ‘लाच गुपचूप स्वीकारा..कारण आमचाही वाटा त्यातून यायचा आहे’. (महाराष्ट्रातील आधीचे काही मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, यांनी काय चालवले होते/आहे आपण जाणत नाही काय! जे आडात तेच पोहऱ्यात येणार) म्हणजेच केंद्रात काही फार वेगळे नसणार.. तर अशाप्रकारे जनरलना सुनावण्यात आले असेल. पण माणूस ताठ कण्याचा आणि प्रतिबद्ध असल्याने नकार दिला असणार..तेव्हा मग “थांब. सिस्टीम ला आव्हान देतोस काय! आता तुला दाखवतो”, अशा विचारातून जन्मदिनांकाचा घोळ घातला गेला असणार. जनरलची प्रतिमा डागाळावी हा उद्देश समोर ठेऊन हे प्रकरण घडले असावे.

तेव्हा तर्क विविध असले आणि सर्व शक्याशक्यतांचा खेळ असला तरी केंद्रातील सरकार ने सुरक्षेशी तडजोड केली आहे, भ्रष्टाचार बोकाळला आहे आणि जनता हतबल आहे ही गोष्ट स्पष्ट दिसून येत आहे. सरकार बदलले पाहिजे. अर्थात भाजप अथवा भाजपप्रणित आघाडीला एवढी दीर्घकाळ सत्ता मिळाली तर तेव्हाही काही वेगळे चित्र नसेल म्हणा. कारण आजवर आपण बरेच चांगल्या शाळेतील ‘नापास’ विद्यार्थी बघितले आहेत! पण तरीही दीर्घकाळ सत्ता काँग्रेस च्या हातात राहिल्याने सध्याचे भयावह चित्र दिसते आहे. तेव्हा पान का सडले, घोडा का अडला आणि भाकरी का करपली ह्या प्रश्नांचे उत्तर मात्र एकच – फिरवले नाही म्हणून! त्यात आता सरकार ची भर पडली आहे इतकच.  


Saturday, March 3, 2012

O' Father, ye forgoteth thy children?

Italian ship sailing near Bharteeya waters of Kerala fired gunshots at fishermen sailing nearby. Two fishermen hailing from Kerala died in this unfortunate incident.

The Kerala Police have started further procedure by taking responsible persons into custody. Italy rushed to rescue their men and to absolve them of ghastly deeds. Italian Consul General immediately started the procedure of talks and diplomacy. Italy contended that as the incident happened in international waters, Bharteeya Court cannot try its men. Only Italian Court or The International Court will be the appropriate forum to investigate further. This somewhat arrogant stand was taken by Italy within no time. This was undoubtedly in the interest of Italy, and it should be so. And to our surprise Bharteeya administration has stood strong this time. Thanks, still S M Krishna (External Affairs Minister) has not stepped in in the matter! The advocate for prosecution has ensured Italian administration that judicial process in Bharat is ‘free and fair’, so that they need not worry. Justice will be done in this matter.

One has to keep some patience and then react. The reaction, sooner or later, should be in the interest of Bharat. A Bharteeya person should support the cause of the victims and not the culprits.

But to our surprise, despite the strong stand taken by Union Government as well as local authorities in this matter, the stand taken by the Cardinal of Syro Malabar Church – Mar George Alancherry is highly objectionable. One could understand if political leaders at the Centre take a stand to lean on Italy’s side, because we know its interest and adherence to Italian leadership. But a Cardinal who is of this very soil sings in the tunes of Rome? Ironically, he is the 11th Cardinal of Bharat!.
Transformation!
He stated that “I am and will remain in close contact with the Catholic ministers of Kerala and I hope that they will help to pacify the situation. In particular, I trust in the work of the Tourism Minister, the Catholic KV Thomas, who participated in the consistory in Rome in past days and attended the mass with the Holy Father and the new cardinals: he is a man of great moral stature and of significant influence, both in the local and central government, and he assured me his maximum effort. I guarantee, in the next few days, my constant involvement with the Indian authorities on the matter”. (source: http://www.firstpost.com/india/why-is-keralas-newest-cardinal-batting-for-italian-killers-221271.html)
This statement of his invited some criticism, which subsequently made him change his earlier stand. He then maintained that, “I would like to precise my views reported by the news agency “Fides” regarding the incident in which two fishermen were killed in the sea. This event has to be investigated and if there is a culpable action it has to be dealt with legally and the culprits have to be punished. Truth and justice have to be established. What I said the other day parenthetically was that this event shall not become a cause for conflicts and enemity in the communities and between nations. I have no intention to take a mediatory role in the setting of this matter”.( http://www.fides.org/aree/news/newsdet.php?idnews=31062&lan=eng)

Two things should be noted here. Being a Bharateeya, he should have gone and met the families of the fishermen who lost their lives. Here, coincidently, the two dead fishermen were also Christians. He should have consoled the families and kith and kin of the demised. But he did not do so. Instead he asked the Government to soften its stand on Italian marines and ‘forgive them’. Are those Roman Catholics nearer to him than Bharateeya Christians? I cannot resist myself from giving Gandhiji’s quote on religious conversions (especially conversions of Hindus to Christianity), “As I wander about through the length and breadth of India I see many Christian Indians almost ashamed of their birth, certainly of their ancestral religion, and of their ancestral dress. The aping of Europeans by Anglo-Indians is bad enough, but the aping of them by Indian converts is a violence done to their country and, shall I say, even to their new religion.” (Young India: August 8, 1925). Gandhiji had also observed how everything in the case of a convert changes dramatically. He says, “If I had the power and could legislate, I should stop all proselytizing. In Hindu households the advent of a missionary has meant the disruption of the family coming in the wake of change of dress, manners, language, food and drink. (November 5, 1935). Has Cardinal George Alencherry proved this?

I humbly ask therefore, - oh Father, ye forgotteth thy own children? Where shall they knock now?

References: